प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांची जिल्हा बँकेवर धडक.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या
प्रोत्साहन अनुदान अपात्र प्रकरणी अर्थ मंत्री आणि सहकार मंत्री यांच्या बरोबर येत्या आठवड्यात मुबंईत बैठक लावतो.
धनाजी चुडमुंगे यांना बैठकीस येण्याची पालकमंत्र्यांची विनंती
कोल्हापूर / प्रतिनिधी
नियमित व मुदतीत पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती.या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास प्रोत्साहन
मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकी रक्कम देण्याचे घोषित केले होते.सन 2017 ते 2020 या तीन वर्षात किमान दोन वर्ष पीक कर्ज घेऊन ते मुदतीत फेडले
असेल त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार होता.
पण शासनाकडे या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ज्या सहकार विभागाच्या सॉफ्टवेअर मध्ये भरली गेली त्यावेळी अनेक पात्र व प्रामाणिक शेतकऱ्यांना यातून
अपात्र ठरवण्यात आले आणि हा प्रामाणिक शेतकऱ्यावर अन्याय आहे तो दूर करून शेतकऱ्यांना 50,000 चा लाभ द्यावा म्हणून आज कोल्हापूर जिल्हा बँकेवर आंदोलन अंकुशच्या पुढाकाराने शेतकरी एकत्र आले होते.
खालील निकष लावून शेतकऱ्यांना अपात्र केले होते.
1) आपली जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक एका हंगामात एकदाच पीक कर्ज देत असते पण एका हंगामात दोनदा उचल म्हणून शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले.
2) तीन वर्षात एकदाच उचल म्हणून डावलण्यात आले.
3) शेतीसाठी, वाहणासाठी किंवा अन्य शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी बँकेने आकारण इन्कम टॅक्स भरण्यास लावला म्हणून अपात्र ठरवले.
4) मयत लाभार्थी अपात्र
5) 2019 च्या कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थी आहे पण शासनाने लाभ दिला नाही
त्या योजनेत आहे म्हणून या योजनेत अपात्र.अशा प्रकारे नियमित कर्जफेड करणारे आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना अपात्र करून अन्याय केला जात आहे तो होऊ नये म्हणून आपण यातील शेतकऱ्यांना 50 हजार चा लाभ द्यावा अशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती केली.
या प्रामाणिक शेतकऱ्यांना डाववले तर भविष्यात प्रामाणिक पणाला किंमत उरणार नाही आणि मग सगळेच कर्ज बुडावण्याच्या प्रयत्नात राहतील.आणि त्यामुळे जिल्हा बँक अडचणीत येण्याचा धोका आहे
असे धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना सांगितले.त्याचबरोबर शासनाने या सर्व शेतकऱ्यांना पात्र करून अनुदान न दिल्यास जिल्ह्यातील जवळपास 80 हजार अपात्र शेतकऱ्यांना घेऊन 26 जानेवारी 2024 रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर जाऊन आम्ही बसणार
आहोत.जोपर्यंत या शेतकऱ्यांना पात्र ठरवले जात नाही तोपर्यंत आम्ही तेथून हटणार नाही.असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे.