शिरोळ / प्रतिनिधी
भाजपा सरकारने ऑपरेशन लोटस कमळच्या माध्यमातून आमदार विकत घेऊन राज्यातील सरकार पाडण्याचा उद्योग सुरू केला आहे.अन्याय,पाप,आणि धोका हीच भाजपची रीत आहे.महाराष्ट्र राज्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार फोडले,उद्धव ठाकरें शिवसेनेच्या आमदारांना ५० खोके देऊन सत्ता काबीज केली. दुसरीकडे मात्र महायुती सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस यासह जीवनाशक वस्तूचे दर भरमसाठ वाढवून सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल केले.हे सरकार जनतेच्या हिताचे नसून स्वार्थासाठी बनलेले सरकार आहे.अशा सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम.बी पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.आहे.