कुरुंदवाड / प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी सर्वपक्षीयांनी कुरुंदवाड पालिकेकडे यात्रेच्या जागेबाबत माहिती मागवली होती.मात्र, नगररचना विभागाने याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली नसल्याचा आरोप राजू आवळे आणि बाबासाहेब सावगावे यांनी बैठकीत केला.”पालिकेने चुकीची माहिती दिली आहे.यातून प्रशासनाची निष्क्रियता दिसून येते,” असे आवळे यांनी ठणकावत नगर रचना अधिकारी हणमंत महानूर यांना धारेवर धरले.