कोणत्याही क्षणी वजन काटा बंद आंदोलन करणार – संदीप राजोबा

सांगली / प्रतिनिधी

दत्त इंडियाने कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीची वाट न पाहता कोल्हापूर प्रमाणे दर जाहीर करावा अन्यथा कोणत्याही क्षणी वजन काटा बंद आंदोलन करणार अशी माहिती संदीप राजोबा जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी दत्त इंडिया प्रशासनाला कोल्हापूर जिल्हा प्रमाणे गतवर्षी गाळप झालेल्या उसाला शंभर रुपयेचा दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामासाठी ऊसाला एफआरपी अधिक शंभर रुपयाचा पहिला हप्ता दिला पाहिजे असे सांगितले आहे.वेळप्रसंगी उसाची वाहने रोखली होती.त्यामुळे कारखाना दोन ते तीन दिवस बंद होता.दत्त इंडियाची एफ आर पी 3 हजार 50 रुपये असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अधिक शंभर रुपयाची मागणी पहिल्या उचलेसाठी केलेली आहे असे एकूण 3150 रुपये होतात.सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी 3100 जाहीर केलेले आहेत.फक्त पन्नास रुपयाचा फरक व मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे शंभर दत्त इंडियाने द्यावे अशी मागणी आहे.परंतु अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा आमदार जयंत पाटील देऊ देत नाही असे खाजगी मध्ये सांगतात तरी राजारामबापू कारखान्याचे नाव पुढे करून दत्त इंडिया दुटप्पी भूमिका घेत आहे.तरी बाजारातील साखरेचे वाढणारे भाव लक्षात घेता, कोल्हापूर प्रमाणे तात्काळ दर जाहीर करावा.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा खा राजू शेट्टी व ऊस उत्पादक शेतकरी,सर्व स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दत्त इंडिया म्हणजेच वसंतदादा साखर कारखान्यावर वजन काटा बंद आंदोलन कोणत्याही क्षणी करणार आहोत याची नोंद घेऊन कोल्हापूर प्रमाणे तात्काळ दर जाहीर करावा अशा आशयाचे निवेदन दत्त इंडिया कार्यकारी संचालक शरद मोरे,अमोल शिंदे यांना देण्यात आले.जोपर्यंत ऊस दराची कोंडी फोडणार नाहीत तोपर्यंत वजन काट्यावरून हलणार नाही व पुढील होणाऱ्या सर्व परिणामांची व कायदा सुव्यवस्थेत जबाबदारी दत्त इंडिया प्रशासनाची राहील.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा,युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले,मनोहर पाटील,प्रमोद गोंडाचे, सागर पाटील,धन्यकुमार पाटील,विजय पाटील,संदीप पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!