पट्टणकोडोली जिल्हा परिषदेवर भगवा फडकवूया – शिवाजी मुरलीधर जाधव

पट्टणकोडोली / प्रतिनिधी 
ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल.तसेच शिवसेनेचा धगधगता विचार व मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेले लोकहिताचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवासैनिक सज्ज असतील,असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी पट्टणकोडोली येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून ८० टक्के समाजकारण व जमलंच तर २० टक्के राजकारण हा मूलमंत्र समोर ठेवून युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक व युवासेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने आपले वेगळे स्थान राजकारण व समाजकारणात निर्माण केले आहे.त्यामुळे पद म्हणजे अधिकची जबाबदारी या जाणिवेतून पदाधिकाऱ्यांनी संघटना ताकदीने उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केले. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. येथील आपली संघटना बांधणी,जनहिताची आंदोलने, सर्वसामान्य लोकांशी शिवसैनिकांची असणारी नाळ, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल जनमानसांत असणारी आत्मियता यांमुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा शिवसैनिक जिल्हा परिषदेत पाठवून इतिहास घडवण्याचा संकल्प हाती घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी सर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे, उपतालुकाप्रमुख महेश माळी,नितीन गायकवाड,शरद पाटील,प्रविण चव्हाण,तानाजी शिंदे,धुळा रामण्णा,विक्रम जगदाळे,विठ्ठल रामण्णा यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!