वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

पंचगंगा नदी पाठोपाठ आता वारणा नदी पात्रातील पाणी दूषित होत असून,यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठावरील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण

झाला आहे.वारणा नदीत मळी मिश्रित पाणी सोडल्यामुळे दानोळी येथे नदीकाठावर्ती मासे तसेच अन्य जलचर मृत होऊन पाण्यावर तरंगताना गेली दोन।दिवस दिसत आहेत.दूषित पाण्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये साथीचे आजार फैलावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.लोक संख्या वाढीमुळे गावातील सांडपाणी, मळीमिश्रीत,जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र मिश्रित पाणी आदीसह मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नदीमध्ये मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत आहे.मळी मिश्रित पाणी,रसायन युक्त दूषित सांडपाणी नदीत सोडणे, मासेमारीसाठी विषयुक्त रासायनिक औषधे सोडून मासेमारीचा धंदा चालू आहे.आदीसह आरोग्यास घातक पाणी वारणेत मिसळत असल्यामुळे वारणा नदी प्रदूषित झाली आहे.काही दिवसापूर्वी तर चक्क एका चारचाकी मधुन मृत मासे चिकुर्डे पुलावरून वारणा नदीत टाकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.तेव्हा पासून परिसरातील गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.वारणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांना नदीमध्ये मृत माशांचा थर सर्वत्र दिसत आहेत.दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे वारणा नदी काठावरील गावात भितीचे वातावर निर्माण झाले आहे.दरम्यान दानोळी गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी नदी काठावर जाऊन दूषित पाणी केली,त्यामुळे वारणा नदीपात्रात दूषित पाणी आल्यामुळे ग्रामस्थांनी चार दिवस पाणी उकळून,थंड करून पिण्यास वापरावे असे आवाहन दानोळी ग्रामपंचायतीच्यावतीने आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.

Spread the love
error: Content is protected !!