विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला जातो, त्याच्या वरती एक काळा रंगाचा टिळा देखील लावला जातो.तो टिळा काय आहे हे तुम्हाला माहितीये का जितके फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येतात,ते रात्रभर रांगेमध्ये उभे राहतात त्यावर विठ्ठल भगवान असे म्हणतात की मी लोकांच्या दर्शनासाठी इथे उभा आहे.मी त्यांची प्रतीक्षा करतो पण ते लोक माझी प्रतिक्षा करतात हे मला अजिबात स्वीकार नाहीये,आता काही करू शकत लाखो भक्त येतात त्यांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावीच लागणार, म्हणून पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात तिथली माती जमा केली जाते,आणि ती चाळली जाते माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी मिसळलं जातं व त्या मातीमध्ये अबीर थोडासा मिश्रण करून हा विठ्ठलाच्या कपाळावरती एक टिळा लावला जातो खरंच आपला पंढरीचा कैवारी किती मायाळू आहे जो जगाचा पालन करीत आहे.तो भक्तांच्या पायाची माती कपाळाला लावतो.
(या लेखात दिलेली माहिती,सोशल मीडियावर वरून आहे पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही)