“ब्रेकिंग बातमी” शिवसैनिकांना कोंगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवल्याने वातावरण चिघळलं

कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज बेळगावात महाअधिवेशन होणार असून कर्नाटक पोलिसांनी या अधिवेशनाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम असून बेळगावच्या वॅक्सिंग डेपो मैदानावर कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.आज बेळगाव शहरात अधिवेशन परीसरात संचार बंदीचे आदेश देखील देण्यात आले.दरम्यान शिवसेनेचे संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातुन सुमारे 300 शिवसैनिक बेळगावला जात असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोंगनोळी टोल नाक्यावर अडवण्यात आले आहे. यावर संजय पवार म्हणाले कर्नाटक सरकार मराठी माणसाला कशासाठी भीत आहे.केंद्र सरकारची जबाबदारी आहे लोकशाही जिवंत या देशात नाही आहे हे ठाम होतो,वर्षांनून वर्ष आमचा जो भाग आहे, अतिक्रमणच्या कर्नाटक सरकार केलंय त्या भागात तुम्ही अधिवेशन घेताय,ठीक पण प्रत्येक नागरिकाला संविधानाने अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने त्यांची भूमिका मांडणे त्याचं म्हणणं ऐकून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे.मग हा पळपुटेपणा कशासाठी करताय पोलीस प्रशासनाकडून दादागिरी कशाला करताय मोठ्या संख्येने पोलीस एकत्र आणून लाट्या काट्या घेऊन गुन्हे दाखल कशासाठी आणि आम्हाला बंदी का पाकिस्तान मधून आलो आहे का? असा खडा सवाल कर कर्नाटक सरकारला केला. आमच्या राज्यामध्ये देशांमध्ये आम्ही चाललोय आणि आम्ही जाणार मराठी बांधवांच्या पाठीशी कायम ठाम आहोत.आमचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत, आणि केंद्र सरकारला आम्ही विचारतोय काय करताय तुम्हचे उपमुख्यमंत्री मराठ्यांची आहेत ना काय करतात मराठी बांधवांसाठी हिंदू बांधवांसाठी मताचे राजकारणासाठी फक्त त्याच कौतुक करू नका आज मराठी माणूस अडचणीत आहे.त्यामुळे तुम्ही सुद्धा येऊन बेळगाव एकीकरण समितीला आधार देण्याची गरज आहे असेही संजय पवार म्हणाले. टोलनाक्यावर कर्नाटक सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात  महाराष्ट्रातील शिवसैनिकांना अडवल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
Spread the love
error: Content is protected !!