राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा १ किलोमीटर ६ पदरी रस्ता करण्याचा भुमिअधिग्रहणासह येणारा खर्च २५ कोटी रूपये आहे.मग शक्तीपीठ महामार्गास १ किलोमीटरला १०७ कोटी ५० लाख रूपये कसे ? १ किलोमीटरचे ८२ कोटी ५० लाख कुठे व कुणाच्या खिशात जात आहेत ? असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ येथे केले आहे.यावेळी शेट्टी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ विधी झाल्यावरनंतर लगेच 800 किलोमीटरवर लांबीचा शक्तीपीठ मार्ग पूर्ण करणार अशी घोषणा केली त्यांचे बरोबर आहे कारण विधानसभा निवडणुकीत भरपूर प्रमाणात खर्च झाला आहे.तो खर्च भरून काढण्यासाठी असे प्रचंड मोठे प्रकल्प घेतल्याशिवाय पैसा निघणार नाही आणि म्हणूनच त्यांनी ही घोषणा केली असा टोलाही शेट्टी यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
