आपल्या पुराणांमध्ये आणि ग्रंथामध्ये प्रत्येक देवाची परिक्रमा दिलेली आहे.उदाहरणार्थ हनुमानाच्या तीन परिक्रमा,विठ्ठलाच्या पाच परिक्रमा पण महादेवाची फक्त अर्धी परिक्रमा केली जाते.महादेवाच्या शिवलिंगामध्ये त्यांची पूर्ण कुटुंब वास करते आणि ज्या ठिकाणावरून शिवलिंगाचे पाणी वाहत जातं.त्या ठिकाणी भैरवाचे रूप असतं भैरवाला कधीही परिक्रमा दिली जात नाही.जर आपण भैरवाला परिक्रमा दिली किंवा वाहत्या पाण्याला भेदलं तर आपल्या मागे निगेटिव्हिटी येऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का शिवलिंगाच्या वरच्या भागावर जो प्रसाद ठेवलेला असतो,तो कधीही खाऊ नये शिव पुराणानुसार शिवलिंगाच्या वरच्या भागावर महारुद्र अवताराचा वास असतो रुद्र म्हणजे भूतांचा राजा आणि तो प्रसाद या भुतांच्या राजासाठी असतो म्हणजेच रुद्रावतारासाठी म्हणून तोही कधी खाऊ नये नाहीतर निगेटिव्हिटी येते असे सांगितले जाते.