प्राचीन काळात हे एकावर एक दगड रचून बांधलेलं मंदिर

करणेश्वर मंदिराच्या परिसरात आलं की लागतं ते हे प्राचीन काळातील शिव मंदिर जिथे छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी येत असत कर्णेश्वर मंदिराचा इतिहास फार मोठा आहे.तो वाचायचा असेल पहायचा असेल तर इथे यावं लागतं या मंदिराच्या प्रत्येक शिलेवरती या मंदिराचा इतिहास घडलेला आहे.

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपले सर्वांचं मनापासून स्वागत करतो.आज आपण जाणार होतो.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्राचीन मंदिरामध्ये म्हणजेच करणे कर्णेश्वर मंदिरामध्ये या मंदिरामध्ये जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संगमेश्वर गाठाव लागेल.संगमेश्वरला पोहोचायचे आधी पावसाने जोरदार हजेरी लावली म्हणून आम्ही एका मूर्ती कारखान्यामध्ये थांबलो तिथे एक काका भेटले जे मूर्ती घडवण्याचं काम करत होते.म्हणून त्यांना भेटण्यासाठी आत मध्ये गेलो आत मध्ये खूप सुंदर प्रकारच्या मुर्त्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या त्या काकांनी स्वतःच्या हाताने घडवल्या होत्या.थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो. आम्ही कसबेच्या दिशेने निघालो हे होतं संगमेश्वर तालुक्यातील कसबा हे गाव जिथे संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक सोडून थोडं पुढे आलात की एक उजव्या साईडला फाटा जातो तो सरळ मंदिराकडे जातो.मंदिराचे दर्शन लांबूनच आपल्याला घडतं गाडी पार्क केली. आणि मंदिराच्या दिशेने निघालो मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे.मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक आपल्याला मोठा असा महादरवाजा पाहायला मिळतो.आम्ही सभामंडपामध्ये प्रवेश केला बाहेरील वातावरण कितीही गरम असलं तरीही मंदिराच्या गाभाऱ्यात विलक्षण अशा गारवा जाणवतो.या मंदिरातील सभा मंडपामधील चार खांबांचे कुठेही मोजमापन घेतलं तर ते समान आहे.मंदिराच्या प्रत्येक शिलेवरती विविध प्रकारच्या देवदेवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.समोर दिसते ती श्री भगवान विष्णूची मूर्ती आणि मुख्य शिवलिंगाचे दर्शन होतं.बाजूलाच पार्वती मातेची सुबक अशी मूर्ती आहे.मंदिरा मधील प्रत्येक खांब, प्रत्येक भिंत, कोणत्या ना कोणत्या नक्षी कामाने सजवले गेले म्हणून ही मंदिरे जपणे गरज आहे.या मंदिराची बांधणी पांडवांनी आज्ञावासात असताना त्यांचा सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ बांधलेले हे मंदिर आहे.मात्र पुढे हे मंदिर पांडवाना अर्धवटच सोडून जावं लागलं.त्यानंतर शीलाहार राजाने या मंदिराचे राहिलेले बांधकाम पूर्ण केलं.मात्र पांडावानी त्या काळामध्ये अनेक मुर्त्या इथे कोरून ठेवल्या आहेत.या मंदिराचे रहस्य गुपित आहे.या मंदिराला तीन दरवाजे आहेत,पाच कळस आणि चार खांबांवर असणार मंडप असे या मंदिराचे बांधकाम आहे. हे मंदिर अनेक दगड एकावर एक रचून बांधलेलं मंदिर आहे.या मंदिराचा कोरीव काम पाहण्यासारखा आहे,की इथं आल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन जातं अलकनंदा आणि शास्त्री नदीच्या काठावर वसलेले या संगमेश्वरांमध्ये हे कर्णेश्वर मंदिर म्हणजेच स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट असे उदाहरण आहे.या भागामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत.इतिहास प्रेमींसाठी अभ्यासकांसाठी हा सगळा भाग एक पर्वणीच आहे.इथे आल्यानंतर इतिहास फार मागे घेऊन जातो अगदी महाभारतापर्यंत अशी मंदिरे आपण टिकवणे काळाची खूप गरज आहे.
Spread the love
error: Content is protected !!