नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून कायद्यांचे उल्लंघन केले आहे.वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करता ग्रामसेवक गैर
कारभाराला खत पाणी घालत आहेत असा आरोप करत गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंडप टाकून ठिया आंदोलन केले.ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची सत्तारूढ
सदस्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ही यावेळी काही प्रमुख नेते मंडळींनी केली आहे.आज सकाळी 11 नंतर या आंदोलनात सुरुवात झाली यावेळी गावातील प्रमुख नेते कार्यकर्ते
या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.त्यांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करून वरिष्ठांच्याकडे लेखी तक्रारीचे निवेदन सादर केले आहे.या निवेदनात म्हटले आहे की
शासन दरबारी सुनावणीत उपसरपंच व सत्तारूढ काही सदस्यांनी खोटा अहवाल सादर केल्यामुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.सध्या ग्रामपंचायतीला सरपंच नाही ही गोष्ट
लाजिरवाणी आहे.विना ठराव गटर्स बांधणी,पेव्हिंग ब्लॉक बाबत केलेला गैरकारभार,वृक्षतोड करून त्याची परस्पर विल्हेवाट लावणे,बनातील रस्त्याच्या कामात गैरकारभार करून उघड्या
गटर्स ठेवणे असा आरोप मराठा महासंघाचे नेते सागर धनवडे यांनी यावेळी केला.3 कोटी 46 लाखांच्या पेयजल योजनेकडे जाणून-मधून दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे गावाला अशुद्ध व दूषित
पाणी पिण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे असा आरोप माजी उपसरपंच अनंत धनवडे यांनी केला.यावेळी सरपंचांना उच्च न्यायालयाने जात पडताळणी वरून दोषी ठरविले असताना
देखील त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येतात व कारभारात सहभाग घेतात असा प्रमुख आरोप ही यावेळी करण्यात आला. ग्रामपंचायतच्या विद्यमान पदाधिकारी व सत्तारूढ सदस्यांनी
केलेल्या गैरकारभाराची खाते नियाह चौकशी कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिरोळ गटविकास अधिकारी यांनी तातडीने चौकशी करावी संबंधितांच्या वर कारवाई करावी
अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायतचे सदस्य चेतन गवळी,प्रीतम साळुंखे,अजय कंदले,माजी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर गवंडी यांनी दिला आहे.
यावेळी संतोष मुळे अवधूत धनवडे,दत्तात्रय भोसले, प्रताप धनवडे,संदीप रमेश कांबळे गणेश सुतार गुरुप्रसाद धनवडे आदी गावातील मान्यवर ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.