वाढीव वीज बिल माफ करा अन्यथा उपोषण – बोरगाव यंत्रमाग धारकांचा इशारा

बोरगांव / प्रतिनिधी

राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत.मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल माफ न करता पून्हा त्यात वाढ करण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे.

याबाबत सरकारला अनेक निवेदने देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी ६ डिसेंबरपर्यंत वाढीव विज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा बोरगाव येथील विद्युत चालीत मग्गगळ नेकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आज बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क येथे यंत्रमाग व्यवसायिकांच्या आयोजित पत्रकार बैठकीत संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब बंकापुरे म्हणाले कर्नाटक राज्यात वस्त्र उद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीकडे पाहून आम्ही लहान मोठ्या बँकांनाकडून याठिकाणी लाखो रुपयांचे कर्ज घेवून यंत्रमाग व्यवसाय उभा केला आहे.

पण सध्या शासनाकडून सर्व सबसिडी व अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रमाग धारक मोठ्या अडचणीत आला आहे.असे असताना सध्या वाढीव बिलाचा भुर्दंड आमच्या माथी पडल्यामुळे अक्षरशा कारखाना बंद करण्याची वेळ आमच्यावर येऊन ठेपली आहे.

पूर्वी १ रुपये २५ पैसे येणाऱ्या वीज बिलाची सध्या ९ रुपये ७५ पैसे प्रमाणे आकारणी केली जात आहे.त्यामुळे या बिलात दामदुप्पटीने भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी हा व्यवसाय मोडकळीस येत आहे.

त्यामुळे जर या व्यवसायाला उर्जित अवस्था द्यावयाचे झाल्यास शासनाने वीज बिलात सवलत देणे गरजेचे आहे.दहा वर्षांपूर्वी सरकारी जागेवर बोरगाव येथे व्यवसायाचे जाळे विस्तारण्यात आले.या व्यवसायात सुमारे ४० कारखानदारानी लाखो रुपयांची गुंतवणूक करून,जवळपास ५०० हून अधिक यंत्रमाग कामगारांना उदरनिर्वाह उपलब्ध करून दिला आहे.

पण वीज बीलाने त्रस्त होऊन गेलेल्या यंत्रमाग धारकांनी सद्या हा व्यवसाय बंदच ठेवल्याने या सर्व कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे शासनाने वाढीव वीज बिल मागे घेऊन आपणाला वीज बिलात सवलती द्याव्या अशी मागणी यंत्रमाग कारखानदारांनी केली आहे.

Spread the love
error: Content is protected !!