कलाविश्व रंगभूमीतर्फे आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार प्रदान
शिरोळ / प्रतिनिधी
सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कलाविश्व रंगभूमी संस्थेचे काम कौतुकास्पद आहे.या संस्थेच्या प्रेरणादायी प्रोत्साहनामुळे अनेक कलाकारांना संधी मिळाली आहे.त्यामुळे कला संस्था व
कलाकार यांच्या विषयी अभिमान वाटतो.समाज मनाला आनंद देणारा कलाकार असतो.कलाकारामुळे समाजाला परिवर्तनाची दिशा मिळत असते.यापुढेही कलाकारांनी लोकप्रबोधनाच्या चळवळी बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर कार्य सुरु ठेवून लौकिक मिळवावा.
असे मत शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी व्यक्त केले.शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व सोशल फौंडेशन संस्थेचा ३४ वा वर्धापन दिन व मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ झाला.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.दत्त साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच शेखर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.गटविकास अधिकारी शंकर कवितके कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कलाविश्व रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केले.कार्याध्यक्ष डॉ दगडू माने यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.यावेळी ‘आम्ही रंगकर्मी ‘ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात शेखर पाटील म्हणाले,शिरोळ तालुक्यातील कलाकारांनी सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.कलाविश्व रंगभूमी संस्थेने समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून
नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले असून अशा कार्यक्रमाचे आयोजन सतत होण्याची गरज आहे.समाजाभिमुख काम करणाऱ्या कला संस्था व कलाकारांच्या पाठीशी राहून सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.
या समारंभात मान्यवरांच्या हस्ते दिव्या मगदूम(उदगांव)-संगीत प्रेरणा पुरस्कार,पियुष काकडे(शिरोळ)नाट्यप्रेरणा पुरस्कार, हौशी कलाकार अविनाश सुर्यवंशी(यड्राव)-आदर्श रंगकर्मी पुरस्कार,प्रज्ञा माळकर (शिरोळ)-वक्तृत्व प्रेरणा पुरस्कार,माजी
सैनिक संजय माने(जयसिंगपूर)-सेवारत्न पुरस्कार तसेच सुनिल संकपाळ(शेडशाळ),संतोष साने(यड्राव),बाळासाहेब माळी (शिरोळ)यांना आदर्श पत्रकार पुरस्कार तर अनिल उर्फ राजू देशमुख(शिरोळ) यांना दिव्यांग सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी झी मराठी सारेगमप फेम दिव्या मगदूम,रावसाहेब भोसले या कलाकारांनी सादर केलेल्या गीत गायनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,गटविकास अधिकारी कवितके,दत्तचे संचालक शेखर पाटील पुरस्कार प्राप्त कु प्रज्ञा माळकर यांची भाषणे झाली.
समारंभास दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.आशाताई गाडीवडर-शिंदे,सिनेअभिनेत्री रेश्मा शेख,दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे,शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील,
सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील-कणंगलेकर,सुनिल इनामदार,दिलीप माने,संजय इंगळे,प्रदिप आयगोळे,सुनिता पाटील,रुकया केरूरे,शबीना मुजावर,सुधाकर तावदारे,डॉ.शंकर कुंभार,सचिन कमलाकर,रोहित कांबळे,
अनिल पाटील,उदय शिरोळकर,ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार,बाळासाहेब कांबळे,संजय सुतार,शंकर कांबळे,सचेतन बनसोडे,गणेश पवार,सुधाकर तावदारे,भूपाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.पत्रकार विश्वास कांबळे यांनी आभार मानले.