अन्यथा वाहतूक रोखून धरू आंदोलन अंकुशचा इशारा
सांगली / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना आणि कारखान्यांच्या मध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे मागील ऊसाला दुसरा हप्ता १००/ रुपये व चालूला किमान ३१००/ पहिली उचल द्यावी अशा
मागणीचे निवेदन आज आंदोलन अंकुशच्या वतीने दत्त इंडिया सांगली व्यवस्थापनास देण्यात आले.सदरचे निवेदन शरद उर्फ बापू मोरे यांनी स्वीकारले.दिलेल्या निवेदनात म्हटले की आपला
कारखाना कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागातुन उसाची उचल करत असतो.आपल्या कारखान्याची ऊसतोड यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळून येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी
संघटना व कारखानदारांच्या मध्ये सन २०२२-२३ मध्ये आलेल्या उसास मागील फरक बिल १००/ रुपये प्रति टन देण्याचे ठरले आहे व चालू हंगामाला एफ आर पी अधिक १००/ रुपये
पहिले बिल देण्याचे ठरले आहे.या निर्णयाचा विचार करून येणाऱ्या उसास प्रति टन ३१००/ रुपये वरील निर्णयाप्रमाणे दर जाहीर करावा.आपल्याकडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका
न घेतली गेल्यास शिरोळ तालुक्यातील आपल्या कारखाण्याच्या तोडी रोखल्या जातील व उसाची वाहने सुद्धा रोखून धरण्यात येतील.तरी तात्काळ दरवाडीचे पत्रक काढून शेतकरी हित
जपावे ही विनंती.यावेळी धनाजी चुडमुंगे,दीपक पाटील, सांगलवाडीचे आनंदा पाटील,सुनील यादव,आप्पासो कदम,व सुदीप पाटील उपस्थित होते.