कुरूंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे साखर कारखानदारांचे हाडवैर असताना फक्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर द्यावा लागतो म्हणून ते एकत्र येतात.मात्र आता शेतकऱ्यांनी ही
एकसंघ होऊन या कारखानदारांचा हिशोब चुकता केला पाहिजे. असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.येथील ओंकार चौक येथे स्वाभिमानी शेतकरी
संघटनेच्या आयोजित आभार सभेत माजी खास.शेट्टी बोलत होते.अध्यक्षस्थानी गोपाळ चव्हाण होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले.माजी नगराध्यक्ष जयराम पाटील,रावसाहेब पाटील,सावकार मदनाईक,सागर शंभुशेट्टी,आण्णासाहेब जोंग, सचिन शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.आम्ही चळवळीच्या
माध्यमातून १०० रुपये घेतले आहेत.आम्ही यावरती समाधानी आहोत असे नाही,उर्वरित पैसे घेण्यासाठी कारखानदारांना गुडघे टेकायला लावू असा इशारा शेट्टी यांनी दिला.यावेळी सावकर
मादनाईक म्हणाले,ऊस दराची आणि मागील पैशासाठीची शेतकऱ्यांची चळवळ कारखानदारांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघटनेच्या आंदोलनावर
विश्वास होता.म्हणून त्यांनी ऊसतोड घेतली नाही.या विश्वासाच्या जोरावर पाठीमागचे काही देता येत नाही आमचा हिशोब झाला आहे.असे म्हणणाऱ्या कारखानदाराकडून शेतकरी आंदोलनाच्या
माध्यमातून मागील ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले हेच चळवळीचे खरे यश आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील,रावसाहेब पाटील,सचिन शिंदे,गोपाळ चव्हाण
आदींनी भाषणे केली.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती
सुवर्णा अपराज,अँड.जयकुमार पोमाजे,शैलेश आडके,बंडू उमडाळे,बंटी देसाई,धोंडीराम चौगुले,तानाजी आलासे,योगेश जिवाजे,फारूक जमादार,सुरेश बिंदगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.