शिरोळ नगरीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा व दर्शन,

शिरोळ ऐतिहासिक दर्शन

शिरोळ हा गाव प्राचीन काळापासून कोल्हापूर राज्याचा एक घटक म्हणून विकास पावत आलेला आहे. कोणत्याही ठिकाणची संस्कृती व लोकजीवन पद्धती हे तेथील राजवटी वरच अवलंबून असते.

प्राचीन काळापासून कोल्हापूरला झालेल्या राजवटीचे विहंगम दर्शन घेतले तर त्यात किमान आठ प्रमुख राजवटी होऊन गेल्याचे दिसते.ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शातकर्णि राजे यांच्याअमलाखाली कोल्हापूर प्रांत होता.इसवी सन ५०० ते

७६० पर्यंत कदंब वंशाची राजवट येथे होती.इसवी सन ७६०ते९७३ राष्ट्रकूट राजाच्या ताब्यात आणि ९७३ ते१०५० चालुक्य राजे येथे राज्य करीत होते.इसवी सन १०५० नंतरची राजवट विशेष गाजलेली दिसते.महामंडलेश्वर शिलाहार वंशीय

राजाने आपल्या स्थापत्यशास्त्रतून राज्यातील प्रगतीचे अवशेष ठीकठिकाणी कोरीव मंदिर उभारणी आजही राखिले आहेत हे राजे जीनधर्मा अनुयायी होते.या राजानी १५ किल्ले बांधले त्यातच”शिरोळ चा भुईकोट किल्ला “असावा पन्हाळा,

भुदरगड,विशाळगड, सामनागड इत्यादी दुसरी किल्ले आहेत.दुसऱ्या भोज राजानंतर ही साताऱ्यापासून हिरण्यकेशर पर्यंत असलेली राजवट सन १२०९ मध्ये संपली.सन ११२०ते१३४७ यादवांचे राज्य येथे आले.या देवगडचे यादवनी

मुसलमानांची लढत असलेल्या विजयनगरच्या राजास मदत केली असावी असे दिसते.या भागातील माने घराणे (रहीमतपुर,विसापूर,मसवड)यांच्या मदतीने जाऊन परत आल्यावर त्यांनी शिरोळ जवळ वास्तव्य केले.तेथे आजही

विजयनगरी देवीचे छोटेसे देऊळ आहे व त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी “हळगाव “आहे पूर्ण उध्वस्त स्थितीत असलेले.
सन १३४७ ते १४८९ या काळात हा भाग ब्राह्म श्टी उर्फ बहामनी राज्याच्या आमला खाली गेला व पुढे १३४७ ते १७००

मुसलमानी आमदानी चालू होती.विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात हा मुलुख होता.पण १६६९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेऊन १६६९ पासून मराठा राजवट सुरू केली.या छत्रपतीनीं सून ताराबाई महाराणी यांना कोल्हापूर

सातारच्या राज्यापासून स्वतंत्र केले.दरम्यान पेशव्यांनी पटवर्धन यामार्फत कोल्हापूरवर अनेक स्वाऱ्या केल्या त्यामुळे हा शिरोळ भाग अनेक वेळा पटवर्धनांच्या ताब्यात गेला.परशुराम पटवर्धन यांनी तिसरा शिवाजीस शिरोळ मुक्कामी जिंकले तेव्हा येथील

विजापूरचा सुभेदार नूरखान यांचा घुमट पाडला.या लढाया १७६० पासून १८१२ पर्यंत चालू होत्या.या प्राचीन व अर्वाचीन इतिहासाच्या घडामोडीचे आजच्या शिरोळमध्ये काही अवशेष आहेत.शिलाहारवंशी राजांनी बांधलेला हा भुईकोट किल्ला होता

त्याचे अवशेष आज गावाच्या प्रवेशद्वारातच बुरुजाच्या स्वरूपात दिसत होते.या प्रवेशद्वारातून आत आल्यावर पुन्हा सुंदर व दुसरे प्रवेशद्वार चावडी जवळ होते.दुसरे प्रवेशद्वार दक्षिणेस लहान वेश या नावाने संबोधले जाते.खंदकाचे किल्ल्या बाहेरील अवशेष तर आणि ठिकाणे आहेत.

या गावाला पाणी पुरवठा करता यावा म्हणून गावच्या पश्चिमेस दोन मोठे तलाव बांधण्याची व तेथून गावाला पाणीपुरवठा करता यावा म्हणून झालेला प्रयत्न दिसून येतो हे दोन्ही तलाव पैकी एक मौजे अगर येथील तलाव आणि.कोल्हापूरच्या छत्रपती शाहू

महाराजांनी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी कल्लेश्वर देवालया नजीक कलेश्वर तलाव बांधला व त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जात असे.नूरखान यांनी बांधलेले दोन घुमट त्यातील एका घुमटाचा आज फक्त पाया दोन मशिदी दोन खाऱ्या
विहिरी ही नूरखानची आठवण आजही देतात.

कलमेश्वर मंदिराचे अवशेष ठिकाणी पडलेल्या दगडात पहावयास मिळतात.या नूरखान सरदाराने दिलेल्या इनाम जमिनी आज ही या घराने कडे चालू आहेत.

श्री छत्रपती शाहू महाराज यांनी विद्या प्रसार करण्याच्या हेतूने सुरु केलेले १०० वर्षा पूर्विचे ग्रंथालय हे त्यांच्या विद्या प्रेमींचे दोतक म्हणावे लागेल आणि हे ग्रंथालय सद्यस्थितीला प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते.या गावी तिसरे शिवाजी

महाराज यांनी काही दिवस आपली राजधानी ठेवली होती.व आपल्या राजवाड्यात जवळ कचेरीही (कोर्ट) ठेवली होती.याची साक्ष त्यांनी बांधलेल्या बालेकिल्ल्याचा पडका तट व कोर्टाची पडकी इमारत देत आहे.या शिवाजी महाराजांची गादी त्यांच्या

पडक्या वाड्यात होती.ती आज गावचा प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आणून तेथे तक्ता साठी नवी भक्कम इमारत बांधून त्यात ठेवली आहे.याशिवाय मुलांची मराठी शाळा,दवाखाना व कचेरी यासाठी बांधलेल्या इमारती मराठा आमदानितील सुधारणांची साक्ष देतात.

पश्चिमेस व दक्षिणेस पंचगंगा,दूधगंगा, उत्तरेस वारणा व पूर्वेस कृष्णा असा चार नद्यांमधील दोआब (चतूअबी) भाग्यात वसलेला जलसमृद्धीने युक्त असा हा गाव भाग्यशाली नाही असे कोण म्हणेल? कोल्हापूर जिल्ह्यात इतक्या नद्यांनी सुपीक

केलेला हा एकमेव गाव आहे.या चार नद्यांची गावाला लाभलेली जलसंपत्ती,उषा पैशाला व दोन्ही बाजूस अथांग पाणी वाहत असल्यामुळे येथील जमिनी मध्ये सोनं पिकु लागलं अनेक उपसा जलसिंचन योजना यामुळे बऱ्याच जमिनी ओलिताखाली

आणल्या जाऊ लागली.शिरोळ तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असलेला येथील पंढरीत अगदी देशात अव्वल नंबरचा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मोठ्या दिमाखात उभा आहे.

शिरोळ गावात शिक्षणाचा प्रसार देखील चांगला आहे.शिरोळ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ व ज्युनियर कॉलेज तसेच जनता हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल मराठी प्राथमिक शाळा अशा अनेक ज्ञान प्रसार करण्याच्या शाखा उभारल्या गेल्या आहेत.

सद्यस्थितीला शिरोळमध्ये “नगरपरिषद”झाले मुळे शिरोळ शहराची आणखीन सुधारणा होत आहे.खरोखर आम्ही भाग्यवान आहोत.अशा धार्मिक ऐतिहासिक संस्कृती आणि सांस्कृतिक महती असणाऱ्या पुण्यवान गावात आम्ही जन्म घेतला आहे. आम्हाला शिरोळवासीयांना अभिमान आहे.!

माहिती संकलन
सचिन उर्फ शशिकांत पवार

Spread the love
error: Content is protected !!