शिरोळ / प्रतिनिधी
आपल्या महाराष्ट्राची भूमी ही “संतांची भूमी “म्हणून ओळखली जाते.आणि अशा या भूमीमध्ये अनेक संतांच्या बरोबर स्त्री संत सुद्धा होऊन गेल्या आहेत.याचप्रमाणे शिरोळ नगरीमध्ये सुद्धा
एक अध्यात्मिक क्षेत्रात आपले पूर्ण आयुष्य सत्संगाच्या माध्यमातून पोथीवाचन पारायण प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून शिरोळमधील काळे गल्ली येथील प्रसिद्ध
“गोखलेवाडा” येथे महिलांची मांदियाळी गोळा करून त्यांना अध्यात्मिक संस्कार करण्याचे महत्कार्य परमपूज्य श्रीमती शीलवंती अनंत गोखलेमाई करीत असत.त्यांना अखंड शिरोळ
आणि आणि परिसर ओळखीत असे.अशा या परमपूज्य गोखले माई या नुकतेच ९४ व्या वर्षी वैकुंठवासी झाल्या.या माई तशा प्रसिद्धीपासून दूरच असत.अशा या महिला संत श्रेष्ठ असणाऱ्या
श्रीमती परमपूज्य गोखले माई यांच्या आठवणी प्रित्यर्थ लेखप्रपंच
माझे सासर शिरोळ म्हणजे एक अध्यात्माची पंढरीच इथल्या मातीला एक वेगळाच गंध या पावन भूमीला श्री गुरुदत्त महाराजांचे अवतार श्रीमन नरसिंह सरस्वती महाराज श्री बुवाफन
महाराज अशा थोर विभूतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य शिरोळ नगरीत ३५ वर्षापूर्वी शिरोळ गाव कामगार पोलीस पाटील कै. शिवाजीराव भिमबहादर माने पाटील यांच्या थोरल्या
स्नुषा म्हणून तसेच शिरोळ नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री अमरसिंह शिवाजीराव भीम बहादर माने पाटील यांच्याशी माझा शुभविवाह होऊन या पाटील घराण्यात प्रवेश झाला.तसे आमचे
हे घराने जरी समाजकारण आणि राजकारण यांच्याशी निगडीत असले तरी माझ्या सासुबाई कै.स्वर्गीय माईसाहेब सौ मंगला देवी या आपल्या सासूबाई प्रमाणे धार्मिक आणि अध्यात्मिक
वसा आणि वारसा जपणाऱ्या होत्या.यांच्या मार्गदर्शन आणि संस्काराने माझ्यामध्ये सुद्धा हळूहळू बदल होऊ लागला. मला एक प्रकारची अध्यात्माची गोडी वाटू लागली.आणि आमच्या
माईनी सांगितलेल्या अध्यात्माच्या वाटेवर माझी वाटचाल होऊ लागली.आमच्या सासूबाई म्हणजेच माई साहेबांनी आणि आमच्या आजी सासू यांनी आम्हाला एक दिवशी पोथीवाचन
प्रवचन निरुपण अशा वेगवेगळ्या अध्यात्मिक बैठकीसाठी काळी गल्ली शिरोळ येथे प्रसिद्ध असा मोठा “गोखले वाडा” येथे सत्संगासाठी म्हणजे अध्यात्मिक बैठकीसाठी आपल्या सोबत
प्रथमच मी आणि आमच्या शेजारच्या महिलांच्या बरोबर या गोखले वाडयामध्ये गेले. येथे आमच्या सासुबाई माईच्या वयाची आणि त्यांची खास सखी मैत्रीन असणाऱ्या एक तेजस्वी अशी
महिला पाहायला मिळाल्या आणि ही महिला म्हणजेच
परमपूज्य गोखले माई यांच्या कचेहऱ्यावर एक वेगळेच दिव्य तेज होते.जिभेवर जणूकाही सरस्वतीच नांदत आहे.अशा
परमपूज्य गोखले माई यांचे मला दर्शन झाले.या गोखलेवाड्यात शिरोळ मधील बऱ्याच लांबून अनेक महिला भगिनी या गोखले माईच्या प्रवचनासाठी भजन किर्तन,पोथी श्रवण करण्यासाठी
सोबत साखर उदबती घेऊन दररोज येत असत.या गोखले माई तशा बाराही महिने आपला हा अध्यात्मिक कार्यक्रम सुरू ठेवत असत.आणि विशेष म्हणजे माघ महिन्यात प्रत्येक पारायण
सोहळा तसेच श्रावण मासा मध्ये या परमपूज्य गोखले माई श्री दासबोध हरिविजय रामविजय नवनाथ कथासार अशा अनेक धार्मिक ग्रंथांचे अखंड पारायण सोहळा या माध्यमातून या
माईच्या मुखातून भक्ती मार्गदर्शनाचा अध्यात्माचा झरा वाहत असे यांच्या वाणीने आणि अध्यात्मिक निरुपण करण्याची पद्धत यामुळे अनेक महिलांना यांचे प्रवचन,भजन,किर्तन किंवा
पोथीवाचन ऐकल्याशिवाय संसारात गोडी वाटायची नाही आणि मनही लागायचे नाही.या गोखले माईची मधुर आणि अबोल वाणी अजून सुद्धा मी विसरलेले नाही.त्या नेहमी म्हणायच्या
मनाच्या अंगणात भक्तीच्या पारिजातकाचे झाड लावावे म्हणजे सौख्याची सुगंधी फुले पडतील आपल्या जीवनात उपासनेने मंन शांत झाले की चिडचिड कमी होते.रोग होत नाहीत आणि
शांत मन असल्यावर योग्य मार्ग सुचती ऐहिक प्रगती होते आणि परलौकी मार्ग सोपा होतो.अहंकार निरोप घेतो.तेव्हाच मनात शांततेचे आगमन होते. साधना किंवा उपासना म्हणजे
उपास-तापास असा देह दंड नव्हे तर देहाचा विसर पडून मिळणारा स्वानंद आहे.आणि या शिकवणीचा उपयोग आम्हाला पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही आमचा प्रवास मागे
वळून पाहतो.त्यावेळेला या गोखलेमाईनी सांगितलेल्या काही अशा अनेक गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतायत गोखलेमाई यांचे आमच्या वाड्यावर कायम येणे असायचे आमचा पूर्ण
परिवार यांचा आदरतिथ्य करून ह्या परमपूज्य गोखलेमाई दररोज सकाळी साडेसहा वाजता नित्य नियमाने त्यांचं आगमन होत.त्यानंतर आमच्या सासुबाई या अगदी श्रद्धापूर्वक आणि
सेवाभावी मनाने परमपूज्य गोखले माई यांच्यासाठी एक पाठ मांडून त्याच्या भोवताली रांगोळी काढली काढून त्यांना या पाठावर बसवले जायचं त्यांना दूध साखर देऊन नमस्कार
घातला जायचां खास करून महिन्यातील एकादशी आणि द्वादशीला अखंड सौभाग्याच सवाष्ण म्हणून थोडीफार
दक्षणा दिली जात असत.या आमच्या वाड्यात घडणाऱ्या
आदरार्थी संस्कार आम्हाला पाहायला मिळत असतं आणि विशेष म्हणजे आम्ही सून म्हणून त्या परिवारात नवीनच असलेने अशा सुखद घटनांचा आम्ही आत्मसात करू लागलो. आम्ही नवीनच
असलेने आम्हाला सकाळी उठायला थोडा उशीरा झाला की या परमपूज्य गोखले माऊलीचे दर्शन घडत नसत त्यामुळे आम्हाला अंतर्मनात कुठेतरी खटकल्यासारखे वाटत असत.मग
कालावधीनंतर आम्ही सुद्धा मनाने ठरवून आणि निश्चयाने उठून तयार असायचे आणि या गोखले माईच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पहात असे.या गोखले वाड्यात परमपूज्य गोखले माई
दररोज सायंकाळी चार वाजता वाचन करीत असत आणि यासाठी आम्ही जेव्हा आमच्या सासुबाई सौ मंगलादेवी आणि आजी सासू या नित्य नियमाने पोथी श्रवणासाठी जात
होत्या.त्या आम्हालाही सोबत घेऊन जाऊ लागल्या.या काळी सहजासहजी महिलांना घराबाहेर पडण्यास मुभा नसायची. परमपूज्य गोखलेमाई या प्रत्येक रविवारी करुणाष्टक,गुरुवारी
तसेच एकादशी आणि द्वादशी या दिवशी आम्हाला भजनाचा आनंद घेण्यास मिळत होता.अशा या गोखले वाड्यावर फक्त आणि फक्त “महिलांचा सत्संग” म्हणून महिलांची मांदियाळी
मोठ्या प्रमाणावर गर्दीभरत असे.आणि या मांदियाळी मध्ये भजन, कीर्तन,प्रवचन,पारायण,पोथीवाचन अशा भक्तीमय आणि धार्मिक वातावरणात मन प्रसन्न होऊन जायचे.या परम
पूज्य गोखले माईच्या अध्यात्मक बैठकीसाठी जान म्हणजे आम्हा बायकांना एक फार मोठी आनंदाची पर्वणी असायचीआणि या अध्यात्मिक बैठक आणि संस्कार यामुळे आमच्यासारख्या सामान्य
महिलांना भक्तीमार्गाची ओढ निर्माण झाली ती म्हणजे आमच्या परमपूज्य गोखलेमाई यांच्यामुळेच.या परमपूज्य गोखलेमाई यांचा अध्यात्मिक संस्कार आणि आशीर्वादाने आमच्या पाटील
परिवारातील माझ्या आजी सासुबाई माझ्या सासुबाई कै.स्वर्गीय मंगलादेवी तसेच आमच्या ननंद बाई व आमच्या मुली यांना यांचा सहवास आणि सानिध्य लाभल्यामुळे यांनी आपला प्रपंच
आणि परमार्थ करीत असताना या गोखले माईच्या शिकवणीतून भक्तीच्या शिदोरीवरच त्यांनी आपला जीवनप्रवास यशस्वीरित्या केला.या परमपूज्य गोखलेमाई म्हणजे एक प्रकारचे
पारिजातकाचे प्रमाणे त्यांचे वागणे होते.हे झाड जसे आपल्याला ओझळ भरून फुले आणि सुगंध देत असतात.हे झाड लोकांना कोणतीही अपेक्षा न करता फक्त काहीतरी देण्याचे काम करीत
असते याचप्रमाणे आमच्या या पूज्य गोखलेमाई यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार,मीपणा, नसायचा.त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमी आदरयुक्त आणि प्रेमळ स्वभावाचे दर्शन घडत असत.याचे
येथे मी मूर्तिमंत उदाहरण म्हणून आवर्जुन उल्लेख करते.तो म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये किती निरागस होता याचे उदाहरण आपल्याला पुढील वाक्यावरून दिसून येईल.त्या आम्हाला नेहमी
म्हणायच्या आज आपल्या घरी किर्तन आहे.”या वाक्यामध्ये आमच्या घरी ऐवजी “आपल्या घरी” असे त्या म्हणायच्या. किती मनाने मोठ्या होत्या.यांना कशाचीही कोणत्याही वस्तूची
आर्थिक लाभाची असक्ती नसायची.या गोखलेमाई आयुष्यभर लोकांना ज्ञानाबरोबरच भक्तिमार्ग आणि याच माध्यमातून फक्त आनंद आणि आनंद द्यायचे पुण्यकर्म यांच्या हातून घडत
होते.अशा या आमच्या परमपूज्य गोखले माई आम्हाला अध्यात्मिक एक वटवृक्षाचा आधार आणि सावली होत्या.या आपल्यातून वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.तरीसुद्धा
त्यांच्या आठवणी त्यांनी दिलेले ज्ञान,संस्कार,भावभक्ती आम्ही अजून तरी विसरलो नाही.आमच्या स्वर्गीय सासूबाई कै. मंगलादेवी यांनी घातलेल्या परंपरा आणि प्रथेनुसारआम्ही आज
सुद्धाआमच्या जाऊबाई सौ.गायत्री आणि आमच्या सुनबाई यांना घेऊन या शिरोळ मधील प्रसिद्ध अशा गोखले वाड्यात श्री दासबोध यांचे पारायण भजन कीर्तन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा
आम्ही आवर्जुन जाती आणि ही परंपरा आम्ही अखंडित ठेवलेली आहे.आज जरी परमपूज्य गोखलेमाई आपल्यातून त्या गेल्या असल्या तरी त्यांनी या लावलेल्या अध्यात्मिक सेवाभाव
रोपट्याचे रूपांतर वटवृक्षांमध्ये होण्यासाठी अखंडीत कार्य या परमपूज्य गोखलेमाई यांची चारही मुले – मुली आणि सूना या “गोखले वाड्यात”अगदी आवर्जुन हजर असतात,श्रीयुत रामदादा
सौ.सुनिता वहिनी दोघेही येथे येणाऱ्या प्रत्येकाची अगदी आपुलकीने प्रेमाने विचारपुस करतात.हे पाहून नक्कीच आम्हाला परमपूज्य गोखले माईची आठवण येतेच.आणि या त्यांनी
लावलेल्या भक्तिमय रोपट्याला त्यांच्या संपूर्ण परिवाराने अगदी आपुलकीने जोपासले आहे.अशा या परमपूज्य सरस्वती देवता गोखले माई यांच्या सानिध्य आणि सेवाभाव स्मृतीचे आठवणीचे
हिंदोळ्यावर आम्हाला चार शब्द मन मोकळे करण्यासाठी आपण संधी दिलात, याबद्दल आमचा पूर्ण पाटील परिवार आपले शतशत कृतज्ञ आहोत.परमपूज्य गोखले माईच्या पवित्र स्मृतीस अगदी अंतकरणपूर्वक साष्टांग दंडवत..!!
लेख प्रपंच
सौभाग्यवती इंद्रायणी अमरसिंह माने पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्या.
शिरोळ.
शब्दांकन..✍🏻
शशिकांत उर्फ सचिन पवार
शिरोळ.