शेतकरी एकत्रित येत मार्किंगचे काम बंद पाडले

रत्नागिरी-नागपूर महामार्गातील चोकाक ते उदगाव राष्ट्रीय मार्गातील उदगाव,उमळवाड व जैनापूर येथे प्रस्तावित मार्गासाठी मार्किंग करण्याचे काम प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होते.मात्र,अद्याप जुन्या बायपास मार्गावरून मार्ग निश्चित झालेला नाही.याबाबत खासदार धैर्यशील माने यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.मात्र,कर्मचाऱ्यांनी काम बंद न केल्याने    उदगाव,उमळवाड येथील शेतकऱ्यांनी महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांना याची माहिती दिल्यानंतर उदगाव येथे पाटील यांच्यासह शेतकरी एकत्रित येत या मार्किंगचे काम बंद पाडून कर्मचाऱ्यांना परत पाठविले.चोकाक ते उदगाव मार्गात अनेक अडचणी आहेत.तसेच उदगाव येथे नव्याने होणाऱ्या भरावामुळे कोथळी,दानोळी,उमळवाड परिसरात महापुराचा मोठा तडाखा बसणार आहे.त्यामुळे होणारा मार्ग सध्या असलेल्या जुन्या बायपास मार्गावरून करावा,अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे.असे असताना उदगाव ते जैनापूर दरम्यान नवीन सर्व्हे केलेल्या प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्किंग करण्याचे काम सुरू होते.चौपट दर मिळण्याचा निर्णय झाल्याशिवाय

महामार्गाचे उदगाव ते जैनापूरपर्यतचे

कोणतेही काम करू नका.असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Spread the love
error: Content is protected !!