कोथळी-हरिपूर पुलामुळे परिसराचा कायापालट होईल- मंत्री रवींद्र चव्हाण

कोथळी-हरिपूर पुलाचे उद्घाटन संपन्न

कोथळी / प्रतिनिधी
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खाते हे आज अनेक आव्हाने घेऊन नवनवीन रस्ते चॅलेंजर्स स्वीकारत आहेत. हे करत असताना बांधकाम खाते जुनी कात टाकून नव्या पद्धतीने जगाला हेवा वाटणारे आज रस्ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. असे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगली व कोल्हापूर जिल्हा जोडणाऱ्या हरिपूर कोथळी पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, त्यामुळेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे महामंडळ स्थापन करून अनेक कामे त्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. या पुलामुळे आज ग्रामीण भागातील लोकांचा विकास होऊन पर्यटन स्थळला चालना मिळेल आणि अनेक मार्ग जोडून येणाऱ्या काळामध्ये या ग्रामीण भागात सुद्धा काय पालट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ.सुरेश खाडे उपस्थित होते.दरम्यान स्वागत आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या उपस्थित पुलाच्या शिलालेखाचे उद्घाटन करण्यात आले.खासदार संजय पाटील, विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर, माजी मंत्री डॉ.आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील, माजी आमदार नितीन राजे शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली लोकसभा समन्वय शेखर इनामदार, मुन्नाभाई कुरणे, लक्ष्मण नवलाई, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, बांधकाम विभागाचे अमर नलवडे, क्रांतीकुमार मिरजकर, हरिपूरचे सरपंच सौ. राजश्री तांबेकर, कोथळी सरपंच विजय खवाटे यासह मोठ्या संख्येने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन विजय दादा करणे यांनी तर आभार बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता अभय क्षीरसागर यांनी केले.
Spread the love
error: Content is protected !!