श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठशांची पूजा होत असलेले महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण
शिरोळ येथील’दत्तगुरु भोजनपात्र मंदीर
शिरोळ :सचिन उर्फ शशिकांत पवार
करवीर संस्थानातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले शिरोळ गाव आणि एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला म्हणून आणि कृष्ण पंचगंगा या पवित्र नद्यांच्या सुपीक कुशीत वसलेल्या शिरोळ या गावाला अतिशय महत्व आहे.
ते म्हणजे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक वास्तू असणारे छत्रपती शिवाजी महाराज तक्त छत्रपती ताराराणी साहेब यांची असलेली गादी तसेच येथील श्री दत्त महाराजांचे अवतार परमपूज्य श्री.नृसिंह सरस्वती महाराज यांच्या हाताच्या पंजाची ठसे पाषाणावर दिसत असलेले देशातील एकमेव स्थान म्हणजे भोजन पात्र
म्हणून प्रसिद्ध असणारे भोजन पात्र मंदिर आणि तसेच सत्पुरूष श्री बुवाफन महाराज यांची समाधी आणि या इतिहासाच्या साक्षी दारामध्ये गावाच्या पश्चिमेस असणारे नूरखान बादशाह यांचा गोल घुमट दिमाखात उभा असलेला दिसतो आणि या ऐतिहासिक वास्तु बरोबर धार्मिक व अध्यात्मिक घटनांचा साक्षीदार सर्व दत्त भक्तांचे आढळ श्रद्धा स्थान म्हणजेच आपल्या शिरोळ नगरीतील दत्त मंदिर म्हणजेच भोजन पात्र
श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठशांची पूजा होत असलेले महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण
याबाबतची आख्यायिका अशी
दत्तगुरुंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह स्वामी महाराज यांचे १२ वर्ष वाडी परिसरात तपासाठी वास्तव्यास होते.एकदा ते भिक्षा मागण्यासाठी शिरोळला श्री गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या कडे आले.त्यांच्या गृहिणीने महाराजांसाठी जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या.
मात्र कण्या वाढण्यासाठी घरी पात्र नव्हते.हे जाणून महाराजांनी एक पाषाण आणला त्यावर प्रोक्षण करून प्रणव) ॐ) लिहून भिक्षा वाढण्यास सांगितले.या पाषाणास दुधाचा अभिषेक केल्यानंतर दत्ताप्रभूंच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसतात
— सविस्तर कथा —
कृष्णापंचगंगा परिसरात श्री नृसिंहसरस्वती महाराज १३६४ ते १३७६ या कालावधी दरम्यान वास्तव्यास होते.या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यास जात असत.असेच ते शिरोळ या ग्रामी गंगाधरपंत कुलकर्णींच्या घरी भिक्षेस दुपारी गेले असता माई भिक्षा वाढा असे म्हणाले.
गृह्स्वमिनीने त्यांना नमस्कार केला व चांगले स्वागत करून म्हंटले कि गृहधनी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत कृपया थोडे थांबावे.कुलकर्णीच्या घरी अठराविश्व दारीत्र्य होते.मी स्वयंपाक करते असे त्या म्हणाल्या.त्यांच्या घरी जोंधळ्याच्या कण्या शिवाय काही शिल्लक नव्हते.
त्याच त्यांनी शिजवल्या,पण त्या वाढायच्या कशावर असा प्रश्न होता.साधी व धड पत्रावळ देखील नव्हती.महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रणवचिन्ह काढले व भिक्षान्न त्यावर वाढण्यास सांगितले.
भक्तवत्सल यतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना ह्या पात्राची पूजा करा ४२ पिड्यांचा उधार होईल,दारीत्र्य ,दुःख,पीडा नाहीश्या होतील,अन्नपूर्णा सदैव वास करेल असा आशीर्वाद दिला.थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृतांत कळाला.
महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना वाईट वाटले.परंतु ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली.त्या पाषाणावर शंख,चक्र,पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली !हेच ते शिरोळचे भोजनपात्र,या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंशपरंपरेने चालत आली आहे.
प्रत्येक गुरुवारी पूजा,रात्री श्रीची पालखी आरती इत्यादी कार्यक्रम होतात.शाही दसरा महाराजांना ५ तोफांची सलामी दिली जाते व १२ वर्षांतून येणारे कन्यागत महापर्वकाळ वेळी २१ तोफांची सलामी असते.दत्तजयंतीला १० दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
!! जय जय भोजनपात्रा सुपवित्रा सप्त ही जल चंद्र पूर्णा न कळे तव सुत्रा !!
!! श्री गुरुदेव दत्त!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!