स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूरचे मोठे योगदान – शरद पवार

निमशिरगाव / प्रतिनिधी

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे.यशवंतराव चव्हाण,दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, पी.बी.पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाट्या खाल्या,तुरुंग भोगला,आंदोलनाच्या झळा सोसल्या.त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत.स्वातंत्र्यलढ्याची माहिती घेत असताना कुंभार व पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही. त्यामुळे कुंभार व पाटील यांचे विचार चिंरतर ठेवण्यासाठी आपण सर्वानी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.निमशिरगांव (ता.शिरोळ) येथे स्वातंत्र्यसेनानी पी.बी.पाटील निमशिरगांव वि.का.स.सेवा सोसायटी नामकरण व स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक स्व.पी.बी. पाटील महसुल भवन इमारत पायाखुदाई कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी सायकांळी करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले,एका छोट्या निमशिरगांव गावातून रत्नाप्पाण्णा कुंभार व पी.बी.पाटील यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.आण्णा मंत्रीमंडळात असताना मी अनुभव घेतला आहे.त्यांना कुणीही प्रश्न विचारला तर आण्णा अचूक माहिती देत होते.आता स्वातंत्र्यनंतर आपण विकासाकडे जात असताना स्व.कुंभार,सा.रे.पाटील, दत्ताजीराव कदम, शामराव पाटील यड्रावकर, पी.बी.पाटील यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही.रत्नाप्पाण्णांच्या स्मारकासाठी सरकारने 5 कोटी दिले आहे.मात्र त्यासाठी अजून निधी हवा आहे.तो राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपलब्ध करावा.पंचगंगा कारखान्यानेही टनाला 200 रुपये देत आहेत.त्यामुळे आण्णांचं स्मारक भव्य उभारले पाहिजे यांची व्यवस्था करा.आणि त्यांचे विचार तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
स्वागत सरपंच अश्विनी गुरव तर प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वाचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,निमशिरगांव गावाची स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळख आहे.तालुक्याच्या विकासासाठी स्व.दे.भ.कुंभार,सा.रे.पाटील,शामराव पाटील यड्रावकर, पी.बी.पाटील यांनी साखर कारखाने,पाणी योजना,सेवा संस्था काढून सर्व क्षेत्रात तालुक्याची वाटचाल यशस्वी केली. त्यांच्या विचाराचा वारसा घेवून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, स्व.दे.भ.कुंभार,सा.रे.पाटील,शामराव पाटील यड्रावकर अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व केले आहे.त्यामुळे आज जिल्हयातील सर्व सेवा संस्था, कारखान्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह सर्वाना न्याय मिळाला.देशाचे नेते पवार यांचे कोल्हापूर जिल्हयावर बारकाईने लक्ष आहे.त्यामुळे आमची भुमिका त्यांना बळ देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा म्हणजे नेतृत्वाची खाण असणारा जिल्हा आहे.त्यामुळेच कोल्हापूरचा चौफेर विकास झाला आहे.स्वातंत्र्यानंतर स्व.दे.भ.कुंभार यांच्यासह अनेक लोकनेत्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याची प्रगतीचा आलेख वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान,खासदार धैर्यशिल माने यांनी आपल्या भाषणात आजच्या कार्यक्रमात तरुण मान्यवर लाभले असल्याचा उल्लेख केला.यावर शरद पवार यांनी खासदार माने यांचे भाषण थांबवून मी 84 वर्षाचा तरुण असल्याचे उत्तर दिले.यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील,माजी आमदार राजीव आवळे,शरद पवार,पृथ्वीराज यादव,तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे,चंद्रकांत जाधव घुणकीकर,महावीर पाटील, कलगोंडा पाटील,स्वस्तिक पाटील,सुप्रिया सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.आभार अजित सुतार यांनी मानले.

मी दुसर्‍यांदा आलो आहे
प्रास्ताविक करताना पापा पाटील यांनी शरद पवार प्रथमच निमशिरगांव येथे आल्याचा उल्लेख केला.यावर शरद पवार यांनी भाषणाच्या प्रथम पापा पाटील आपण चुकला आहात असे सांगत पवार म्हणाले,एक गाव एक पाणवठा या कार्यक्रामात रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर निमशिरगांव येथे येवून सार्वजनिक विहीरीची पाहणी केली होती.त्यामुळे मी पहिल्यांदा नाही तर दुसर्‍यादां निमशिरगांव येथे आलो असल्याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

Spread the love
error: Content is protected !!