लहानपणापासून आपण सुपरहिरो कथा ऐकतआणि व्यंगचित्रे पाहत मोठे होत असतो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुपरहिरो हवा असतो.पण माझ्यासाठी माझे बाबा माझे खरे सुपरहिरो आहेत.असे मत कु.श्रध्दा दिलीप शिरढोणे हिने व्यक्त केले.
माझे बाबा माझ्या कुटुंबाचा कणा आहेत. लहानपणापासून आतापर्यंत दोन मुलीं असूनही मुलांपेक्षा जास्त आमचा हट्ट पुरविला.आणि मुलांपेक्षा ही जास्त काही मुलीही करु शकतात याची जाणीव आम्हाला करुन दिली आहे.फक्त एक शिक्षक म्हणूनच नाही तर अनेक क्षेत्रात,अनेक समाजोपयोगी कार्ये करुन अनेकांसाठी ते त्यांचे आदर्श बनले आहेत. आम्हीही आमच्या पायावर उभे राहून समाजोपयोगी कार्ये करावीत. इंडेपेडंट व्हावे ही त्यांची इच्छा आहे.आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत.आमचे करिअरच्या दृष्टीने चांगली वाटचाल करावी यादृष्टीने ते सतत प्रयत्नशील असतात.त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.आम्ही त्यांच्या इच्छा,अपेक्षा नक्कीच पूर्ण करू आणि त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करू.आपल्या मुलींनी स्वकर्तृत्वावर मोठे होवून समाजाभिमुख आदर्शवत सेवा करावी.अशी बाबांची इच्छा आहे.ती निश्चितच पूर्ण करू.असा विश्वास कु.श्रध्दा शिरढोणे हिने व्यक्त केला.१५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या एक अष्टपैलू,आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री.दिलीप गणपती शिरढोणे यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.१५ जानेवारी १९७३ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात हेरवाड ता.शिरोळ येथे जन्म झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बालपणीच वडिलांचे छ्त्र हरविलेल्या पण आपल्या मुलांना मोठे करुन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काबाडकष्ट, मोलमजुरी करुन पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारी माता.तिने केलेले कष्ट,संस्कार, अनुभवलेली गरीबी,इतरांनी केलेली मदत या सर्व गोष्टींचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो.म्हणूनच सर्व क्षेत्रात, चांगल्या – वाईट प्रसंगी सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात.बऱ्याच वेळा स्वतःच्या कुटुंबापेक्षा इतरांना त्यांच्या अडचणीत मदत करण्यासाठी अग्रेसर असतात.अनेक निराधार,गरजू कुटुंबाना मदतीचा हात स्वतः देवून इतरांना प्रेरित करतात. अनेकांचे कुटुंब सावरले आहेत.त्यांच्या या निस्वार्थी, निगर्वी स्वभावामुळे ते प्रत्येकांच्या मनांमनात त्यांच्या विषयी आदराची भावना निर्माण झाली आहे.स्पष्ट,सडेतोड व निर्भिड बोलणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपली मते स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या या स्वभावाचे अनेकजण चाहते आहेत.समाजातील बरेचसे लोक फक्त आपण व आपले कुटुंब यांतच गुरफटलेले असतात.मात्र याला माझे बाबा अपवाद आहेत.आपला जन्म अडचणीत सापडलेल्या व गरजू,निराधार लोकांसाठीच आहे.असे ते समजतात. स्वतःच्या इच्छा -आकांक्षा,गरजा इकडे लक्ष कमी पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद पाहण्यात ते धन्यता मानतात.शैक्षणिक,सामाजिक, सहकार,राजकीय,प्रसारमाध्यम अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सतत काही ना काही नवीन शिकण्याची त्यांची जिद्दवाखाणण्याजोगी आहे. आजही या वयात एम.ए. (एज्यु.)ही एम.एड.समकक्ष पदव्युत्तर पदवी पूर्ण करताना पाहून सतत शिकले पाहिजे याची प्रेरणा मिळते.स्वतः उच्चशिक्षित असूनही इतरांना कधीच कमी लेखत नाहीत.एक परिपूर्ण नेतृत्व कसे असावे?याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे बाबा.ज्या काही गोष्टी त्यांच्या मनाला पटत नाहीत त्याचा ते कधीच स्वीकार करीत नाहीत.बाबांच्याकडे गुणवत्ता व पात्रता असूनही शिरोळ तालुका प्राथमिक सेवकांची सहकारी पतसंस्था कुरुंदवाड या संस्थेत चेअरमन पदासाठी प्रतिक्षा करावी लागली. पण संस्थेच्या व सभासदांच्या सेवेत कोठेच कमी पडले नाहीत.परंतु कोविड कालावधीमुळे निवडणुका पुढे गेल्याने अल्पकाळासाठी चेअरमन पद मिळाले.त्यांच्या निवडीप्रसंगी ऐतिहासिक अशी गर्दी जमल्याचे अनेकजण आवर्जून सांगतात.यांतच आम्हांला समजून चुकले की बाबांनी इतरांच्यासाठी खर्च केलेला वेळ सत्कारणी लागला याचे समाधान वाटले.याच दरम्यान काही गोष्टींच्यामुळे बाबांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला.जवळचे मित्र, ज्यांच्यासाठी बाबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून,रात्री -अपरात्री मदत केली अशांनीही बाबांची साथ सोडली.पण संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाणारे बाबा डगमगतील ते कसले?संयम व धीरोदात्तपणा हे एक माझ्या बाबांचा गुण आहे.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बाबा करीत नाहीत. बाबांची बदनामी करण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला पण या सगळ्यांना डगमगतील ते बाबा कसले?बाबांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांना हाताशी धरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.बाबांची ३० वर्षांची ज्ञानसाधनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला.३० वर्षे बाबा पडेल ती जबाबदारी न कुरकुरता पार पाडली.ना शेऱ्याची अपेक्षा,ना वेतनवाढीची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या बाबांचे अवमूल्यन करण्याच्या प्रयत्नांने बाबा व्यथित झाले.त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक कधीच झाले नाही.महापूर,कोरोना सारख्या आपत्तीमध्ये अनेक लोकांनी तब्येतीची कारणे सांगून माघार घेतली.पण माझे बाबा अगदी आमच्या कुटुंबातील व्यक्तींचाही विचार न करता मनोभावे सेवा करुन धीर देण्याचा व सर्व्हेक्षण करण्याचे काम चोखपणे केले.त्याबद्दल बाबांच्या आदराने पाहिले जाते.शैक्षणिक कार्यातही बाबा कधीच मागे पडले नाहीत. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करीत राहिले. हेरवाडमधील कुमार व कन्या शाळा कनिष्ठ शाळांचे वरिष्ठ शाळांत रुपांतर करण्यात बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्हां दोघी भगिनींना जिल्हा परिषदेच्या हेरवाडच्या कन्या शाळेतच सातवी पर्यंतचे शिक्षणासाठी ठेवले.शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे शाळा ७ वी पर्यंत केली.राजापूरमध्ये पदवीधर वेतनश्रेणी नसतानाही वर्गाध्यापन व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले. महापुराच्या विळख्यात असणाऱ्या राजापुरात नावेतून जावून ही शैक्षणिक सेवा केली.तेथील कार्याचा ग्रामस्थ व विद्यार्थी आवर्जून उल्लेख करतात.माझ्या बाबांची चौफेर कामगिरी होत असताना अनेकांना हेवा वाटतो. काहीजणांना असूया वाटते.पण बाबांच्या कामगिरीचे कौतुक करणारेही काही कमी नाहीत.अशा सर्वसामान्य लोकांसाठी बाबा जीवाचे रान करून रात्र न दिवस कार्यरत असतात.प्रसंगी आम्हां कुटुंबियांना कमी वेळ मिळतो.पण त्यांचा नावलौकिक पाहून आम्हीही सदैव त्यांना सहकार्य करतो.बाबांचा अनेक ठिकाणी होणारा सन्मान पाहून आम्ही भारावून जातो.एक बाबा म्हणून त्यांचा नेहमीच कौतुक वाटते.मी होस्टेलला असताना मला भेटायला येताना आमच्या सर्व मैत्रिणींना आपल्या बाबांसारखे वाटत असायचे.सर्वांची आस्थेने चौकशी करून सर्वांची अडचण दूर करणारे माझ्या बाबांचा खूपच अभिमान वाटतो.आज माझ्या बाबांचे नाव प्रसिध्दी माध्यमातही गाजत आहे.यासाठी त्यांनी दिलेले योगदानाचीच ही पोचपावती आहे.अप्रकाशित शाळा व व्यक्तींना प्रकाशात आणण्याचे कार्य बांबाच्या हातून घडत आहे.निस्वार्थीपणाने सामाजिक कार्य कसे करावे?याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्या बाबांचे घेता येईल.
माझ्या बाबांच्या हातून अनेक समाजोपयोगी कार्य करण्यासाठी ईश्वराने त्यांना उदंड व आरोग्यमय जीवन मिळावे.अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते त्यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
शब्दांकन- कु.श्रध्दा दिलीप शिरढोणे. (एम.फार्म )