पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राष्ट्रनिर्मितेचे जे स्वप्न पाहिले व सत्यात उतरविले तो तसाच सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास रयतेचे राज्य साकारणे व स्वामी विवेकानंद यांची अध्यात्मिक शक्ती यांचा संगम पंतप्रधान मोदींच्या व्यक्तिमत्वात असून हा विकसित
भारत संकल्प विकास रथ जनतेच्या सर्वांगीण विकासाचे पंतप्रधान मोदींनी पाहिलेले स्वप्न तुमच्याकडे घेऊन आला असे प्रतिपादन मौजे वडगाव ता.हातकणंगले येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या वेळी सिंदिया यांनी मोदींनी भारत येत्या काळात गरिबीमुक्त भारत घडविण्यासोबतच जपान भारत यासारख्या प्रगतिशील देशांच्या पंक्तीत भारताला नेण्याचा संकल्प केला असून अनेक दशकांचा विकासाचा दुष्काळ संपविला असून सत्तेचा फायदा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले असल्याचे सांगितले.
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा हा उपक्रम राबविला जात असून त्या अंतर्गत मौजे वडगाव ( ता.हातकणंगले ) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एकात्मिक बालविकास अंतर्गत अंगणवाडी, पोषण अभियान ,पी.एम.किसन योजना,वैयक्तिक शौचालय लाभार्थी, पंतप्रधान,रमाई आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजना,संजय गांधी निराधार योजना,प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना,कृषी विभागाच्या वतीने शेतकरी हिताच्या राबविण्यात येणाऱ्या योजना इत्यादी योजनेच्या लाभार्थ्यांनी मिळणाऱ्या लाभांची माहिती दिली.
या वेळी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या कामाची पाहणी करून माहिती घेतली या वेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी महामार्गासाठी भूसंपादन कमी सहकार्य केल्याचे सांगितले.तर महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी कामाबाबत माहिती दिली दरम्यान सिंदिया यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या
अंतर्गत आवास प्राप्त लाभार्थ्याच्या घरकुलास प्रत्यक्ष भेट देऊन लाभार्थींशी संवाद साधला तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी याना स्वच्छ भारत योजनेअंतर्गत केलेल्या कामासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी ग्रामपंचायत च्या वतीने कॅन्सर रुग्णालय,केंद्रीय विद्यालय, गावातील सर्व कुटुंबांना मोफत गॅसपूररवठा होण्यासाठी ची कार्यवाही होण्याची मागणी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली.
या वेळी जनकल्याण योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी च्या सहकार्याने जिल्हा अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न करत असून जनतेने या विकसित भारत संकल्प संकल्पनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी ज्यांच्याकडे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेची जबाबदारी आहे त्या ज्योतिरादित्य सिंदिया साहेबांना कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा पाठीशी राहून पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी साथ देऊ असे प्रतिपादन शौमिका महाडिक यांनी आपल्या मनोगतात केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने यावेळी नागपूर रत्नागिरी महामार्गावर शेतकरी व शाळकरी विध्यार्थी यांच्या साठी भुयारी मार्ग तयार होण्याची गरज प्रतिपादन करत मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला सर्वानी साथ देण्याचे अवाहन केले. राजवर्धन निंबाळकर यांनी ही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रम प्रसंगी रेणुका सावंत, दिपाली विजय तेली प्रधानमंत्री आवास योजना, एकनाथ कांबरे जॉब कार्ड,आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड,संजय गांधी निराधार भाग्यश्री पाटील आदी लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात गौरविण्यात आले.
स्वप्नील चौगुले प्रस्ताविक केले तर आभार सरपंच कस्तुरी पाटील यांनी केले कार्यक्रमास माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, सत्यजित देशमुख समरजीत घाटगे,अरुण इंगवले, अशोक माने ,मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष पाटील,
प्रांताधिकारी मौसमी बर्डे,तहसीलदार कल्पना ढवळे,गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,उपसरपंच सुनील खरेपाटने सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.