जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यासह आसपासच्या गावातील आणि कर्नाटक सीमा भागातील वाहनधारक आणि वाहन चालक यांना परिवहन खात्याची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने दर बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आरटीओ कॅम्प सुरू असतो.
समितीच्या कार्यालयाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स्वरूप आणि परिसराला प्रादेशिक परिवहन टेस्टिंग मैदानाचे स्वरूप जरी किमान एक दिवस येत असले तरी सर्व डाऊनची समस्या कायमच आहे.त्यामुळे जयसिंगपूरचा आरटीओ कॅम्प म्हणजे असून अडचणी नसून खोळंबा असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहन
मालक व वाहन चालकातून व्यक्त होत आहे.डिजिटल इंडियाचा बनाव करून सर्वत्र इंटरनेट द्वारा सेवा उपलब्धीचे प्रयत्न किमान ग्रामीण पातळीपर्यंत तरी सध्या पूर्णपणे यशाच्या मार्गावर नसल्याचे दिसत आहे.कर्नाटक सीमा भागातील तसेच शिरोळ तालुका आणि परिसरातील वाहनधारक आणि वाहन
चालकांसाठी हे जयसिंगपूरच्या आरटीओ कॅम्प म्हणजे एक प्रकारे चांगली सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.ही सुविधा फार पूर्वीपासून उपलब्ध असली तरी हजारो नागरिकांना या ठिकाणी सेवा उपलब्ध होते ही समाधानाची बाब आहे.सध्या जवळपास 80 टक्के लोकांकडे किमान दुचाकी तरी आहे.यापैकी बहुतांश
कुटुंबांकडे एक तरी चार चाकी गाडी आहे. त्याचबरोबर फॅशन पुरी व्यापार पेठ असल्यामुळे या शहरात शेकडो अवजड वाहने ही आहेत.वाहन चालवण्याचा परवाना,परवाण्याची नूतनी करण,वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र,त्या प्रमाणपत्राचे नुकतनीकरण, त्याचबरोबर वार्षिक कर भरणे,प्रदूषण नियमक प्रमाणपत्र अशा
अनेक सेवा आठवड्यातून एक वेळा या शहरात या कॅम्पमध्ये उपलब्ध होतात.दुसरीकडे होणारी हजारोंची गर्दी लक्षात घेता जमणारा लोकांसाठी चहा नाश्ता वगैरे सुविधा या परिसरात उपलब्ध होत्या मात्र आज तसे खाद्यपदार्थाचे कोणतेही स्टॉल येथे दिसून आलेले नाहीत.
डिजिटल इंडिया ऑनलाईन सेवा हा सगळा प्रकार तरी प्रगतीपथावर असला तर प्रत्येक खात्यातील या सर्व डाऊनच्या समस्येचे काय करायचे याचा विचार कोणीही करत नाही.किंवा त्या विरोधात आवाज सुद्धा कोणी उठवलेला नाही.सर्वप्रथम नियम पाळण्याचा कर्तव्य बजावण्याचा प्रचंड ताण, त्यानंतर कोणत्याही एजंटला
मध्ये घेतल्याशिवाय स्वतः काम करण्यासाठी प्रयत्न करताना होणारी अडचण, अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी एजंटची करावी लागणारी मनधरणी आणि पाय धरणी आणि त्यात कमी म्हणून काय ही सर्वर डाऊन ची समस्या या सगळ्या त्रासामुळे वाहन चालक वाहन मालक सर्वच कमालीचे संतापले आहेत.