कोल्हापूर / प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीतील घटक पक्षांचे मेळावे १४ जानेवारी रोजी जिल्हा पातळीवर होत आहेत. कोल्हापुरात दुपारी दोन वाजता महासैनिक दरबार येथे होणारा महायुतीचा मेळावा मोठ्या उच्चांकी गर्दीने यशस्वी करूया.या माध्यमातून महायुतीमधील एकोपा
आणि सामंजस्याचा आदर्श राज्यासह संपूर्ण देशाला दाखवून देऊया तसेच महायुतीचा हा मेळावा उच्चांकी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसा,असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कोल्हापुरात कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहात महायुतीमधील घटक पक्षांच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ‘अबकी बार -४५ पार…’ या ध्येयाने संघटितपणे काम करूया.महायुती सरकारने राज्यातील विकासाला गती आणि चालना दिलेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे
आणि संपूर्ण देशाच्या आर्थिक उन्नतीचे फार मोठे कार्य केले आहे. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवूया.या कार्याची माहिती देणारी आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणारी संकल्प यात्रा सुरू आहे.या यात्रेमध्ये सहभागी होऊ या आणि योजनांपासून वंचित असलेल्या
पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊया.मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरात महायुतीचा हा भव्य मेळावा होत आहे. त्यानंतर अवघ्या आठवड्यातच आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे.संपूर्ण देश गेले अनेक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होता,
तो क्षण २२ जानेवारीला येत आहे.हाच संदर्भ घेत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या पाचशे वर्षापासून सबंध देश आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतीक्षेत होता.हा दिवस जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी गावा- गावातील विविध
देवदेवतांच्या मंदिरांची साफसफाई आणि रोषणाई करावी.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचीही भाषणेझाली.व्यासपीठावर आमदार राजेश पाटील,
माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार के.पी.पाटील,माजी आमदार अमल महाडिक,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण,आरपीआयचे
जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे,जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्यजित कदम, राहुल चिकोडे, रणजीत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महेश जाधव यांनी केले.आमदार राजेश पाटील यांनी आभार मानले.