अन्यथा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतुक रोखणार

जयसिंगपूर येथे ऊस वाहतुक संघटनेची बैठक संपन्न
जयसिंगपूर / प्रतिनिधी
सध्या राज्यातील ऊसतोड मंजूराना 34 टक्के दरवाढ तर मुकादमाना 1 टक्के दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. वाढती महागाईमुळे ऊस वाहतुकदारांना सध्याच्या दरामुळे साखर कारखान्यांना ऊस पाठविणे अर्थिक अडचणीचे बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतुकदारांना 55 टक्के दरवाढ पंधरा दिवसात करावी अन्यथा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतुक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतुक संघटनेची शनिवारी सायकांळी बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख संदिप राजोबा म्हणाले, राज्यातील ऊसतोड मंजूरांना 34 टक्के दरवाढ केल्यामुळे प्रतिटन 366 रुपये झाले आहेत. त्याचबरोबर मुकादमास 1 टक्के वाढ झाल्याने प्रतिटन 73 रुपये मिळणार आहेत. असे असताना वाढती महागाई, डिझेल, वाहन दुरुस्ती, ऑईल, टायर्स यासह विविध वस्तु मोठ्या प्रमाणात महागल्या असल्याने ऊस वाहतुकदार अडचणीत आले आहे. त्यांची कर्जे सुध्दा फिटत नाहीत. त्यामुळे ऊस वाहतुकदारांना 55 टक्के वाढ द्यावी. याबाबत संघटना साखर संघ व राज्य सरकारकडे मागणी करणार असून येत्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस वाहतुक रोखणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रावसाहेब अबदान, राजू पाटील, प्रविण शेट्टी, प्रा.सुभाष जाधव, डॉ.अनिल कुन्नूरे, प्रकाश पवार यांनी मनोगतात ऊस वाहतुकदारांचे प्रश्न मांडले.
यावेळी विद्यासागर पाटील, विठ्ठल गावडे, तानाजी पाटील, युवराज माळी, दत्ता बाबर, संदिप मगदुम यांच्यासह वाहतुक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!