हातकणंगले / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली होती.यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.मात्र त्यांना नाराजी त्यांना चांगलेच अंगलट आली आहे. जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरुन काढण्यात आले आहे.मुरलीधर जाधव हे गेली तीस वर्षे शिवसेनेत सक्रिय होते.शहरप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुख या पदावर काम केले आहे.गेली १९ वर्षे ते जिल्हाप्रमुख होते.दोन दिवसापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शेट्टी हे उमेदवार असतील अशी शक्यता असल्याने जिल्हाप्रमुख जाधव यांनी,‘उसन्या उमेदवाराला तिकीट देऊ नका.निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी द्या.शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आहेत,दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांनी यापूर्वीही शिवसेनला फसविले आहे.’अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती.जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर वैभव उगळे व संजय चौगुले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत मुरलीधर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,