पुणे / प्रतिनिधी
शिरोळ येथील मिलींद लडगे यांनी “नवरदेव B SC Agri” हा शेतकरी मुलांच्या विवाह जीवनावर आधारित चित्रपट बनविला आहे.२६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.आज पुण्यामध्ये त्यांच्या आर्यन्स एज्युटेन स्टुडियोमध्ये या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.शेती करणाऱ्या मुलांची लग्न का होत नाहीत ? शेती व्यवसायाकडे व त्या कुटुंबाकडे बघण्याचा समाजाचा कल का? बदलला आहे.शेतक-यांच्या आयुष्यात समाजामध्ये वावरत असताना कशा पध्दतीने संकटाना सामोरे जावे लागते.अशा पध्दतीने शेतक-यांचे वास्तव जीवन या चित्रपटातून प्रदर्शित होणार आहे.भारतात सध्या ४३ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.मात्र बॅालिवूड हॅालिवूड मध्ये शेती,शेतकरी व त्याच्या व्यथा कुठेही प्रकर्षांने मांडल्या गेल्या नाहीत.मिलींद लडगे यांनी अत्यंत परिश्रमाने व कल्पकतेने हा चित्रपट बनविला असून २६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.