शिरोळ / प्रतिनिधी
शाळेच्या माध्यान भोजनामध्ये अंडी व अंड्याचे पदार्थ देण्याचा घेतलेला निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा अशा मागणीचे निवेदन सकल जैन समाजाच्यावतीने येथील तहसिल कार्यालयास देण्यात आले.
शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार अनिकुमार हेळकर यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे तात्काळ भावना कळवू असे आश्वासन दिले.
यावेळी संदीप पाटील, राजू रोजे, भारती पाटील, शरद चौगुले, भाऊसाहेब हुल्लिकीरे, निलेश शिरोटे, किरण सिदनाळे, गिरीश उदगावे, शरद चौगुले, संदीप पाटील, उत्कर्ष पाटील, सचिन गतारे, संजय ऐनापूरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपसभापती राजगोंडा पाटील, सागर मादनाईक, डॉ.शितल पाटील, अदिनाथ मादनाईक, डॉ.शांतीनाथ चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जैन, वारकरी, ब्राम्हण, लिंगायत यासह अनेक संप्रदायाचे नागरीक शुध्द शाहाकारी आहेत.
शासनाने माध्यान भोजनामध्ये अंडी व अंड्याचे पदार्थ देण्याचा घेतलेला निर्णय सर्व पोल्ट्री इंडस्ट्रिजच्या दबावामुळे घेण्यात आला आहे. शेतकर्यांचे नाव पुढे करून ही योजना आणली असली तरी यात शेतकर्यांचे हित नाही. अंडीऐवजी दुध, केळी, शेंगदाणे, व गुळाचा खडा, सुकडी, राजगीरा लाडू, भरड धान्या द्यावे,
दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पोषण आहारात दुध दिल्यामुळे मुलांचे आरोग्य सदृढ राहणार आहे. त्यामुळे शाळेत अंडी वाटप बंद करावे अन्यथा जन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.