नृसिंहवाडी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन येथील पोलीस दूरक्षेत्रात पोलीस उपस्थित नसतात त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडला किंवा वादावादीचे प्रकार घडले तर तातडीने पोलीस येण्यासारखे यंत्रणा या
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नसल्याने भाविक तसेच नागरिकांतून नाराजी व्यक्त होतोय यामुळे तातडीने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी येथील दूरक्षेत्रात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमावेत अशी मागणी होत आहे.शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठ्या प्रमाणात
भाविकांची गर्दी असते येथील भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच वाहनांच्या गर्दीनुसार वाहने पार्किंग करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही.नृसिंहवाडी शिरोळ तसेच नृसिंहवाडी कुरुंदवाड मार्गावर वाहन पार्किंग केले जाते.काहीवेळेस वाहनची बेशिस्त पार्किंग झाल्याने अरुंद रस्त्यावर वाहनधारकांच्यात वारंवार वादावादी होत
आहे.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातून भाविक येथे येतात त्यांना त्रास होईल असे काही टवाळखोरांचे वावर वाढले आहे.तर चोरटे,पाकीटमार यांचीही वर्दळ या ठिकाणी असते.या सर्वांना आळा घालण्यासाठी शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत येणारे पोलीस दुरर्क्षेत्र नृसिंहवाडीत
आहे.परंतु तेथे पोलीस कायमस्वरूपी नसतात त्या दूरक्षेत्र रिकामे पडले आहे.रस्त्यावर अनेक वेळा वाहनधारकात तसेच तरुणांच्या वादावादीचे प्रकार दैनंदिन बनले आहे.यामुळे वाहतूक कोंडी होते.तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. तातडीने पोलिसांना पाचारण करणे अडचणीचे बनले आहे.यामुळे येथील दुरुक्षेत्र कधी
कार्यरत होणार असा सवाल नागरिक ग्रामस्थातून उपस्थित होतो.तर शनिवारी,रविवारी भाविकांची गर्दी पाहता या ठिकाणी पोलीस तसेच वाहतूक नियंत्रण पोलीस असणे आवश्यक आहे तीर्थक्षेत्र असूनही भाविकांची सुरक्षितता राम भरवशाची आहे. यामुळे याकडे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी लक्ष
घालणार का?तसेच बंद असलेले दुरक्षेत्रात तातडीने पोलीस तैनात करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.जर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमणूक केले तर अनुचित प्रकार रोखता येऊन त्याला आळा बसणार आहे