अखिल साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरढोण यांच्यावतीने आज दिनांक 31 डिसेंबर रोजी झालेल्या १० व्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आई श्रीमती रत्नाबाई शेट्टी यांना “ आदर्श माता” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मात्र श्रीमती शेट्टी यांची तब्येत खालावली असल्याने आज संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील, डॉ. श्रीकांत पाटील व प्रा.डॉ.दीपक स्वामी सर यांनी घरी येवून हा पुरस्कार दिला.
सदर पुरस्काराने माझ्या आईस सन्मानित केल्याबद्दल मी अखिल साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरढोण या संस्थेच्या पदाधिकारी यांचा मनापासून आभारी आहे.