विज्ञान सांगते भुतं करणी भानामती सर्व झुठ..!आपण विज्ञान युगात वावरत आहोत तरी देखील लोकांच्या डोक्यातून भुतं करणी भानामती सारखे प्रकार जाताना दिसत नाहीत.पुर्वी असले प्रकार मोठ्या प्रमाणात होत होते.या भाऊबंदकी संपत्ती मिळवण्यासाठी आहे प्रकार होता असतं आता त्याला वेगळंच वळण लागले आहे. भानामती सारखे प्रकरणात तरूण पिढीचा ही सहभाग वाढलेला आहे.यात हाफ क्रिकेट,शर्यती,दहीहंडी इ प्रतिस्पर्धचा पराभव होण्यासाठी स्मशानात काळी बाहुली,लिंबू,सुपारी,नारळ,हळद-कुंकू इ.साहित्य ठेवले जाते.त्या बाहुलीवर नांवे मंडळाची नांवे घालून टाचणीने टोचून स्मशानभूमीत ठेवून एक प्रकारची भिंती निर्माण केली जाते.असा प्रकार शिरोळ तालुक्यात शिरोळ दानोळी काही दिवसांपूर्वी दिसून आला.यामुळे नागरिकांच्या मनात एक प्रकारची भिती निर्माण झाली आहे.अशा ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जाऊन भांडाफोड केला आहे.त्यांनी प्रबोधन देखील केले आहे अशी जर मांत्रिका शक्ती असती तर तो तुमच्या कडे हजार पाचशे रुपये यांची मागणी केली नसती तो जगावर राज्य केला असता आशा घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता आशा घटने कडे दुर्लक्ष केले पाहिजे करणी भानामती भुतं आहे असे सिद्ध करून दाखवल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंचवीस लाखाचे बक्षीस लावले आहे.
खंडेराव हेरवाडे – शिरोळ