शालेय स्तरापासूनच व्यायाम आणि मैदानी खेळाची गरज – उपाध्ये

कुरुंदवाड / सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ नाही.लहान वयातच अनेकांना व्याधींचा सामना करावा लागत आहे. त्या व्याधींचा समूळ नायनाट करायचा असेल तर शालेय स्तरापासूनच व्यायाम आणि मैदानी खेळ करणे आज काळाची गरज आहे.असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी समुद्रविजय उपाध्ये यांनी केले.आलास ता.शिरोळ येथील कलाश्री डॉ.बा.ग.पवार ए.बी. हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष तातोबा शहापुरे होते.प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.स्वागत सुनिता जोंग यांनी इतर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक विजय कडाळे यांनी केले पाहुण्यांचा सत्कार प्रभारी मुख्याध्यापक विजय कडाळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते खो-खो, हॉलीबॉल, गोळाफेक,थाळीफेक,लंगडी,पळणे या मैदानांंचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण येवारे यांनी तर आभार प्रकाशराव चाटे यांनी मानले.यावेळी अस्मिता पुजारी,रफिक मखमला,सहदेव केंगळे,विजय पाटील,दत्ता धुमाळे,सुधाकर शिंदे,गोपाळ मोरे, शोभा गावडे या मान्यवरांंसह पालक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!