शासकीय मालमत्ता खाजगीकरणाचा निषेध : अखिल भारतीय बाैद्ध धम्म महापरिषदेत ठराव

वैज्ञानिक दृष्ट्या जागृत हाेऊन बुद्ध विचाराची कास धरली पाहिजे : भदंत प्रा.डाॅ. यशकाश्यपायन

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 

आजची परिस्थिती ही मानव आणि राेबाेट यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आहे.तंत्रज्ञानाचा हा काळ आहे. त्यामुळे माणूस जिवंत ठेवायचा असेल तर मानवाने वैज्ञानिक दृष्ट्या जागृत हाेऊन बुद्ध विचाराची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन पूज्य भदंत प्रा.डाॅ. यशकाश्यपायन महास्थवीर यांनी केले. वैशाली बाैद्ध विहाराच्या प्रांगणात आयाेजित ३३ व्या अखिल भारतीय बाैद्ध धम्म महापरिषदेस मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून भदंत बाेलत हाेते.ते पुढे म्हणाले, हे २१ वे शतक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांनी परिपूर्ण व्हा, पाली भाषा ही अभिजात भाषा झाली पाहिजे. बाैद्धांची भाषा ही पाली भाषाच आहे. आजच्या युगात तिसèया महायुद्धाची दाट शक्यता असून अनेक देश एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. अशावेळी काेण प्रासंगिक आहे याचा शाेध घ्यावा लागेल. ४५० अब्ज वर्षांपूर्वी जगाची निर्मिती झाली आणि अडीच लाख वर्षांपूर्वी मानवाची निर्मिती झाली. मात्र दहा हजार वर्षांपूर्वी तत्त्वज्ञानाचे सर्वंकष दर्शन हे आमच्या भारत देशाने जगाला दिले याचा अभिमान भ. यशकाश्यपायन यांनी व्यक्त केला. नऊ तत्त्वज्ञानाचे दर्शन भारताने जगाला दिले, त्याचबराेबर दहावे तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद याचेही दर्शन याच शतकात भारताने जगाला दिले आहे. मानवाचा जन्म आहे म्हणजे दुःख आहे. त्याला कारण आहे दुर्बुद्धी आणि दुर्बुद्धीमुळे तृष्णा निर्माण हाेऊन त्यातूनच दुःखाची निर्मिती हाेते. दुःख निवारण्याचा उपाय आहे आणि ताे उपाय केलाच पाहिजे, ही बाैद्ध तत्त्वज्ञानातील आर्यसत्य सांगून भदंत यशकाश्यपायन यांनी राजगृह सांस्कृतिक भवन जयसिंगपूर येथील वैशाली बाैद्ध विहारात अपूर्ण राहिले आहे, ते सरकारने पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली. या मागणीकडे दुर्लक्ष केले तर समाजकल्याण समाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान पूज्य भदंत आनंद स्थविर, पूज्य भिक्कूनी बुद्धकन्याजी, पूज्य भदंत कश्यप स्थवीर, पूज्य भदंत प्रा.डाॅ.एम. सत्यपाल महास्थवीर यांनी उपासकांना बाैद्ध तत्त्वज्ञानाची महती त्यांच्या प्रवचनातून सांगितली.
भारत सरकारने विविध बाबींचे खाजगीकरण केले आहे. शासकीय मालमत्तेचे खाजगीकरण धाेरण आणि प्राथमिक शाळेच्या खाजगीकरणाचा निषेधासह विविध १० मागण्यांचे ठराव आज येथील ३३ व्या अखिल भारतीय बाैद्ध धम्म महापरिषदेत करण्यात आले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बाैद्ध संस्कार मंडळ व संलग्न संस्थांच्या वतीने आयाेजित अखिल भारतीय बाैद्ध धम्म महापरिषद आज हजाराे बहुजन बंधू भगिनींचे उपस्थितीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी पु. भदंत प्रा. डाॅ. यशकाश्यपायन महास्थवीर हाेते. जयसिंगपूर-शिराेळ राेड लगतच्या लुम्बिनी वनातील वैशाली बुद्ध विहाराच्या प्रांगणात शिराेळ येथील पंचायत समिती आवारातून धम्मज्याेत प्रज्वलित करून युवा धम्म रक्षा दल आणि विविध युवक संघटना रॅलीद्वारे आणली. तेथे धम्मज्याेती रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर धम्म ध्वजाराेहण, धम्मध्वज गीत गायन झाले. परिषद स्थळी सर्व उपासक उपासिका आल्या. रमाई उपासिका संघाने उपासक उपसिकांसह धम्मगुरुंचेही स्वागत केले. यावेळी बाेधिवृक्ष वंदना करण्यात आली. परिषद स्थळी भिक्खू संघाचे आगमन झाले. पु. भदंत प्रा. डाॅ. एम. सत्यपाल महास्थवीर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मालार्पण, दीप प्रज्वलन झाले. कालकथित संचालकांना आणि दिवंगत प्रतिष्ठित विचारवंतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमाई उपासिका संघाने याचना केली. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण केले. यावेळी पूर्णाकृती पुतळा शिल्पकार कपिल सुनील आलासकर यांचा तसेच पुतळा दायकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबराेबर रावसाहेब कांबळे (जांभळीकर) यांची भरत अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि बंडा मिनचे, सुनील चाैगुले यांनी २०० ग्रंथ दान केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन व सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बाैद्ध संस्कार मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. धनंजय कर्णिक यांनी केले. गेल्या 33 वर्षातील मंडळाच्या कार्याचा आढावा डाॅ. कर्णिक यांनी घेतला.या परिषदेत करण्यात आलेले ठराव पुढील प्रमाणे, 1. बिहार सरकारचा 1949 चा कायदा रद्द करून संपूर्ण विश्वातील बाैध्दांचे पवित्र क्षेत्र असलेल्या बुध्दगया येथील महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बाैध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. 2. पाली ही आपल्या देशाची प्राचीन बाेली भाषा आहे. भगवान बुध्दांचा न्याय, नीती, सद्गुण सदाचाराचा संपूर्ण उपदेश पाली भाषेत आहे. ही बहुमाेल भाषा सर्वांना अवगत व्हावी म्हणून पाली भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. तसेच राज्य घटनेच्या अनुच्छेद 344 (1) आणि 351 नुसार पाली भाषेचा समावेश राज्य घटनेच्या आठव्या अनुसूचित करण्यात यावा. 3. दादर, मुंबई येथील चैत्यभूमीच्या इंदूमीलच्या जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक विनाविलंब पूर्ण करण्यात यावे. 4. बुद्ध लेणी, गुां, शीलालेख, स्तूप ही आपली राष्ट—ीय स्मारके आहेत. लेण्यात आणि लेणी परिसरात काेणत्याही प्रकारचे विकृतीकरण हाेवू नये. पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे लेण्यांना याेग्य संरक्षण देण्यात यावे. 5. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बाैध्द संस्कार मंडळ संचलित वैशाली बुध्द विहार, जयसिंगपूर हे पवित्र क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घाेषित करावे. 6. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा वाढविण्यात यावी. तसेच शिष्यवृत्ती याेजनेत बसू न शकणा-या विद्यार्थ्यांना पदविका, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांना ्रीशिप याेजना लागू करावी. 7. जयसिंगपूर येथे महाराष्ट— शासनाच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या राजगृह सांस्कृतिक भवनासाठी मंजूर असलेल्या अनुदानापाेटी एक काेटी अनुदान प्राप्त झाले असून ते खर्च हाेत आहे. उर्वरित बांधकाम पूर्ण हाेण्यासाठी तीन काेटी रूपये मंजर हाेऊन मिळावेत. 8. भारत सरकारने विविध बाबींचे खाजगीकरण केले आहे. शासकीय माेलीचे खाजगीकरण करण्याच्या या धाेरणाचे महापरिषद निषेध करत आहे. असे ठराव पारित करण्यात आले. या ठरावाचे वाचन प्रा. डाॅ. प्रवीण चंदनशिवे यांनी केले. सायंकाळी कुणाल कांबळे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, सोनियाची उगवली सकाळ, मी वादळवारा,भीमा कोरेगाव यासह विविध गाणी सादर झाली. सूत्र संचालन श्रीकांत कांबळे यांनी केले. तर आभार विजय प्रधान यांनी मानले. यावेळी महाराष्ट- कर्नाटक राज्यासह देशातील विविध राज्यातील बाैद्ध उपासक- उपासिका, विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय नेते कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Spread the love
error: Content is protected !!