‘या’ मागणीसाठी दानोळीतील शेतकरी करणार आमरण उपोषण

बिरदेव मंदिरात आमरण उपोषण, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार कोण?

दानोळी / प्रतिनिधी

दानोळी ता.शिरोळ येथील डोंगर परिसरातील बिरदेव मंदिराच्या मागे सतत वाहणाऱ्या वाघ झर्‍याजवळ आर.सी.सी बंधारा बांधून देण्यात यावे यासाठी १५ जानेवारीला डोंगर भागातील बिरदेव मंदिरात आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी दानोळी ग्रामपंचायतीस दिले आहे.ग्रामपंचायत कार्यालय समोर २८ ऑगस्ट रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले होते.यावेळी तहसीलदार,वनविभागा सोबत बैठक घेऊन ही अध्यापन निर्णय झाला नाही.ग्रामपंचायतीस वारंवार चर्चा करून ही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने आमरण उपोषण करणार असल्याची माहीती उदय होगले यांनी दिली.यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीला न्याय देणार कोण? शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलना शिवाय पर्यायच नाही काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
डोंगर भागातील शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी दानोळीतील शेतकऱ्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली हे दुर्दैव आहे.या भागात कितीही पाऊस पडला तरी या भागात पाण्याची मोठी टंचाई भासत असते.यामुळे डोंगर परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.वारणा नदीतून पाण्याची योजना येऊन ही शेतीसाठी लागणारे पाणी वेळेवर मिळत नसल्याने पिक वाळून जात आहे.शेजारीच पाझर तलावांची दुरवस्था झाली आहे.दरम्यान बंधारा बांधल्याने परिसरातील शेतीसह गावातील विहिर,बोअरवेला पाणी साठा वाढणार आहे.यामुळे पाण्याविना शेतीचे होणारे नुकसान थांबवता येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.यावेळी दानोळी ग्रामपंचायतकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मधून नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले,विजय सिद,पांडूरंग गावडे,सीमा गावडे,दत्ता गावडे,महादेव गावडे,आप्पासाहेब गावडे,अनिल हराळे उपस्थित होते.

 

माझी डोंगर परिसरात शेती आहे.शेतीसाठी कमी पाण्यामुळे शेतीचे नुकसान होते.डोंगर भागात बंधारा बांधले तर पाण्याची कमतरता भासनार नाही. यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे.
– महादेव गावडे, शेतकरी, दानोळी

Spread the love
error: Content is protected !!