शिरटी / प्रतिनिधी
शिरटी ता शिरोळ येथील महावीर नगर वीज बोर्ड मार्गे हा रस्ता अत्यंत खराब झाला होता २००५-१९-२१मध्ये आलेल्या महापुरामध्ये नागरिकांना बाहेर पडण्यासाठी या रस्त्यांवरून जावे लागले तेव्हा पासून हा रस्ता महापुरातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावरून घालवाडचे आरोग्य केंद्र घालवाड मार्गे मिरज ला जाण्यासाठी शिरटी व हसुर मधील नागरिकांना ये जा करण्यासाठी सोईस्कर रस्ता आहे,रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. रस्त्याने प्रवास करणे कठीण जात होते.अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या कामाविषयी मागणी होत होती जनतेच्या समस्यांना गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा कले, आता हा रस्ता चकाचक होणार असल्यामुळे महावीर नगर मधील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.सध्या शिरटी हसुर मधील सर्वच रस्त्यांची कामे सुरू आहेत.तसेच पाणंद रस्ता मंजुर आहेत व काही ठिकाणचे रस्ते पुर्णत्वास येत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वेगवेगळ्या निधी अंतर्गत रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावलेली आहेत,यामुळे त्यांच्या कामांची चर्चा सर्वत्र होत आहे. रस्त्यांची कामे झाल्यानें तालुक्याचा विकास होणार आहे,या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शिरटी किसान सोसायटी चे संचालक प्रदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी आण्णासो सुतार,रामगोडा पाटील, धनाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते अलम मुल्लाणी,राजकुमार कोगनोळे,दादासो गतारे,देशभुषन बुबनाळे,शातिनाथ चौगुले,भाऊसो पाटील,भरत पाटील, राहुल चौगुले, किशोर कांबळे,किसन हुग्गे,सागर कोगनोळे, प्रदिप बन्ने, रियाज मुल्लाणी, वृषभ पाटील,कलगोडा पाटील,नरसगौडा(वकील) पाटील, उपस्थित होते,