शिरोळ नगरीत छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा बैठकीत संकल्प

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज,छत्रपती ताराराणी यांचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ  पुतळा उभा करण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि.22 रोजी छत्रपती शिवाजी महाराज तक्त येथे सर्व समावेशक बैठक पार पडली.बैठकीत छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी एकमत करण्यात आले.याशिवाय पुतळ्याला येणारा खर्च,जागा आणि समिती स्थापन करण्याविषयी सार्वजनिक मते घेण्यात आली. संयोजकांकडून उभारणीसाठी शासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना,राजकीय पाठबळ,जिल्ह्यात इतर ठिकाणी पुतळा उभारणीसाठी निर्माण झालेल्या अडचणीच्या अनुषंगाने अनुभव नमूद केला.या बैठकीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अगदी दोन वर्षात अश्वारूढ पुतळा उभा करू असा आत्मविश्वास व्यक्त केला.पुतळा उभारणीसाठी शहरातील सर्व नागरिकांनी प्रत्येक कुटुंबाने सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असून त्या अनुषंगाने स्थापन झालेली पुतळा समिती/ट्रस्ट योग्य तो निर्णय जाहीर करेल आणि त्याच पद्धतीने वाटचाल करण्यात येईल,यावर सर्वांचे एकमत करण्यात आले.सध्या शिवप्रतिष्ठान कडून छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य पराक्रमी योद्धांच्या समाधीचे जतन,देखभाल, महत्व,जनजागृती केली जात आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी मोठ्या प्रमाणात छत्रपतींच्या मावळ्यांचे संघटन करून छत्रपतींच्या कार्याची,राज्य चालवण्याच्या पद्धतीची गाथा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केल असून त्यांच्या नेतृत्व,मार्गदर्शन आणि अध्यक्ष पदाखाली अश्वरूढ पुतळ्याची उभारणी व्हावी अशी अपेक्षा शहरातील युवकांनी व्यक्त केली.या बैठकीत मा.खा.राजू शेट्टी, मा.आ.उल्हास पाटील,भाजपचे नेते अनिलराव यादव,दरगू गावडे,आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे,स्वाभिमानीचे सचिन शिंदे,युवा नेतृत्व बंटी देसाई,धनाजी पाटील नरदेकर,किरण माने गावडे,मुकुंद गावडे,पंडित काळे,शक्तीजीत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.डी आर.पाटील यांनी प्रास्ताविक तर रावसाहेब देसाई यांनी आभार मानले.
Spread the love
error: Content is protected !!