प्रकाश पतसंस्थेच्या महावीर नगर शाखेचे नुतन वास्तुचे उद्घाटन
शिरटी / प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात प्रकाश पतसंस्थेची स्थापना करून संचालकांच्या जिद्द,चिकाटी आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर संस्थेची महावीर नगर येथे दुसरी शाखा सुरू झाली.ही बाब कौतुकास्पद असून श्रमजीवी आणि ठेवीदाराला दिलासा देण्यासाठी आर्थिक अंधारातुन प्रकाशाकडे जाण्यासाठी समविचारी मानवी संबंधाच्या भावनेने निर्माण केलेली संस्था म्हणुन आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उदघाटन प्रसंगी काढले.शिरटी येथील प्रकाश ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित शिरटीच्या महावीर नगर शाखेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी माजी सभापती मल्लापा चौगुले,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील,चेअरमन पोपट चौगुले व्हा.चेअरमन सुर्यकांत उदगावे यांचा हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे,दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील,सौरभ शेट्टी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संस्थेचे चेअरमन पोपट चौगुले म्हणाले सभासदांचा विश्वासावर शिरटी व महावीर नगर संस्थेच्या शाखा स्व:मालकीच्या आहेत.दोन्ही शाखा संगणकीकृत असून,नेट बॅँकिंग प्रणालीद्वारे आधुनिक बॅँकिंग,एसएमएस,पैसे पाठवने,वीज बिल भरणे या सुविधा देत असल्याचे सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अलम मुल्लाणी,सुभाष शेट्टी,राजु कुरडे, आप्पासाहेब लठ्ठे,संतोष पाटील,रामदास भंडारे,उपसरपंच प्रकाश माळी,व्हा चेअरमन सुर्यकांत उदगावे,संचालक, बापू पाटील,बापु रोजे,जिनपाल शिरगावे आण्णासो सुतार,आप्पासो मगदुम,महावीर खवाटे,कुबेर मगदुम, विश्वास कांबळे,संजय बंडगर, सौ,सुरेखा उदगावे श्रीमती सुनिता पाटील,सल्लागार शातिनाथ चौगुले,राजकुमार कोगनोळे,सर्व संचालक,सभासद, कर्मचारी उपस्थित होते.