ऐतिहासिक शिरोळ नगरीत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभा राहावा
शिरोळ / सचिन ऊर्फ शशिकांत पवार
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड महाराष्ट्राबरोबर शिरोळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरी झाली.या शिवजयंतीचे नियोजन आयोजन हे आमच्या शिरोळ मधील सर्व धर्म कार्यकर्ते सक्रिय सहभागातून दरवर्षी “शिवजयंती” मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
शिरोळ मधील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज तक्त विद्युत रोषणाई रंगीबेरंगी फुलांनी सजवून भगवे झेंडे,पालखी सजवून आणि शिरोळ ऐतिहासिक जय भवानी तोफ आणि या तोफेला मानाचे मानकरी यांचे बैल जोडी जुंपून समोर पारंपारिक वाद्य म्हणजेच हलगी,ढोल ताशा,सिंग,तुताऱ्या या वाद्यांच्या निनादात आणि हत्ती,घोडे,बगी यावर मावळ्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेत बसलेले कार्यकर्ते महिला तसेच गावातील सर्व मानकरी लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पारंपारिक बँड आणि वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला म्हणजेच शोभायात्रेला सुरुवात होते.मिरवणूक मार्गावरील सडे रांगोळी आणि भगव्या पताका यामुळे वातावरण अगदी शिवमय होऊन गेले.या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दरवर्षी खास प्रसिद्ध असे कलाकार असणाऱ्या शाहिरी पोवाडा ऐतिहासिक मर्दानी खेळ असे कार्यक्रम आयोजित केले जातात.कार्यक्रमांमध्ये अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.खरोखर प्रबोधनात्मक शिवजयंती कशी असावी.याचे नीट नेटके नियोजन आयोजन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिरोळ मधील शिवजंती होय उत्कृष्ट शिवजयंती उत्सव सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा केला जातो.आपण ” शिवजयंती” साजरी करत असताना एक महत्वाचा संकल्प केला पाहिजे आणि तो म्हणजे “अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिरोळ नगरीत उभा राहावा..!
“””””””””””””””””””””””””””””” “”””””””””””””””””””””””””
समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर दख्खनच्या पठारावर कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ शहर असून पश्चिम आणि दक्षिण दिषेस पंचगंगा व दूधगंगा उत्तर दिशेवर वारणा आणि पूर्वेस कृष्णा अशा चार नद्यांची भौगोलिक समृद्धी या गावास लाभलीआहे.भाविकात मोठे आदराचे स्थान अद्यापही निर्माण करून बसलेल्या दत्त पंथी श्री नरसिंह सरस्वती यांच्या पदस्पर्शाने आणि भिक्षा प्रसाद कृतीने पावन झालेले भोजन पात्र नजीकच श्री नरसिंह सरस्वती समाधीस्थळ व पादुका पूजास्थान असलेली नरसिंहवाडी ऐतिहासिक घडामोडींनी विकसित संपन्न झालेला हा गाव राजश्री छत्रपतींच्या करवीर संस्थानातील पेटा चौकीचा महत्वाचा गाव म्हणून संबोधले जाते.
“शिरोळ”हा गाव प्राचीन काळापासून कोल्हापूर राज्याचा एक घटक म्हणून विकास पावत आलेला आहे. कोणत्याही ठिकाणची संस्कृती व लोक जीवनपद्धती येथील राजवटी वरच अवलंबून असते.प्राचीन कालापासून कोल्हापूरला झालेल्या राजवटीचे विहंगम दर्शन घेतले तर त्यात किमान आठ प्रमुख राजवटी होऊन गेलेले दिसते.सन १३४७ ते १४८९ या काळात हा भाग ब्रह्मटी उर्फ बहामनी राजाच्या अमलाखाली गेला व पुढे १३४७ ते १७०० मुसलम मी आमदानी चालू होती. विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात हा मुलुख होता. पण १६६९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेऊन १६६९ पासून मराठा राजवट सुरू केली.या छत्रपतीनी सून ताराबाई महाराणी यांना कोल्हापूर सातारच्या राज्यापासून स्वतंत्र केले.दरम्यान पेशव्यांनी पटवर्धन ना मार्फत कोल्हापूर वर अनेक स्वाऱ्या केल्या त्यामुळे हा शिरोळ भाग अनेक वेळा पटवर्धनांच्या ताब्यात गेला.परशुराम पटवर्धनांनी तिसऱ्या शिवाजीस शिरोळ मुक्कामी जिंकले तेव्हा तेथे विजापूरचा सुभेदार नूरखान आणि पटवर्धन यांच्यामध्ये १७६० पासून १८१२ पर्यंत या लढाया चालूच होत्या.या प्राचीन व अर्वाचीन इतिहासाच्या घडा मोडीचे आजच्या शिरोळ मध्ये काही अवशेष आहेत.शिरोळ हे शिलाहार वंशीय राजांनी बांधलेला हा भुईकोट किल्ला होता.त्याचे अवशेष आजही आपल्याला काही ठिकाणे पाहायला मिळतात.यामध्ये आम्ही पाहिलो ते म्हणजे गावच्या प्रवेशद्वारातच बुरुजाच्या रूपात गावची वेस म्हणून आम्हाला पाहायला मिळाले. तसेच या प्रवेशद्वारातून आत आल्यावर पुन्हा खंदक व दुसरे प्रवेशद्वार चावडी जवळ.तसेच तिच्यावरील म्हणजे पूर्वी बांधलेली चौकी म्हणून संबोधले जाते.तसेच या गावाला पाणीपुरवठा करता यावा म्हणून गावाच्या पश्चिमेस दोन मोठे तलाव बांधण्याची व तेथून गावाला पाणीपुरवठा करता यावा म्हणून झालेला प्रयत्न दिसून येतो.कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी गावच्या पाणीपुरवठ्यासाठी कलेश्वर देवालया नजीक कलेश्वर तलाव बांधला व त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग केला जात असे.नूरखान सरदार यांनी बांधलेले दोन घुमट त्यातील एका घुमटाचा फक्त पाया दोन मशिदी दोन खाऱ्या विहिरी सरदार नूरखान यांचीआठवण आजही इतिहासाची साक्ष देतात.श्री छत्रपती शाहू महाराजांनी विद्या प्रसार करण्याच्या हेतूने सुरू केलेले १०० वर्षांपूर्वीचे राजश्री शाहू नगर वाचन मंदिर हे ग्रंथालय हे त्यांचे विद्या प्रेमाचे द्योतक तेथे प्रगती पथावर असल्याचे दिसून येते.शिरोळ या गावी तिसरे शिवाजी महाराज यांनी काही दिवस आपली राजधानी ठेवली होती.व आपल्या राजवाड्यात जवळ कचेरी ही ठेवली होती.याची साक्ष त्याने बांधलेल्या शिरोळ भुईकोट किल्ल्यातील कोर्टाची पडकी इमारत देत आहे.या छत्रपती शिवाजी महाराजांची गादी त्यांच्या पडक्या वाड्यात होती ती आज गावच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ ऐतिहासिक तक्तात ठेवली आहे.शिरोळ या गावच्या नावावरूनच शिरोळ म्हणजे हा निसर्गाच्या देण्याने स्थान महात्म्याने येथील लोकांच्या पराक्रमाने हा गाव सुखी संपन्न आणि भाग्यशाली आहे हे सूचित केले जाते. पश्चिमेस व दक्षिणेस पंचगंगा व दुध गंगा उत्तरेस वारणा व पूर्व स कृष्णा असा 4 नद्यांमधील दोआब भाग्यवंत वसलेला जलसमृद्धीने युक्त असा हा शिरोळ शहर भाग्यशाली नाही असे कोण म्हणेल कोल्हापूर राज्यात इतक्या नद्या आणि सुपीक असलेला हा एकमेव शहर आहे.अशा या ऐतिहासिक,अध्यात्मिक,धार्मिक इतिहासाची परंपरा लाभलेली असलेल्या शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा अशी शिरोळकरांच्या मनातील फार वर्षापासूनची इच्छा आहे.आणि या इच्छा साकार करण्यासाठी आपणं सर्वांनी एत्रितपणे ” संकल्प” केला पाहिजे.हा पुतळा उभारण्यासाठी शहरातील सर्वसामान्य लोकांपासून ते आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,उपसरपंच तसेच विद्यमान नगराध्यक्ष आणि सर्व व नगरसेवक तसेच आजी माजी सन्माननीय खासदार,आमदार आणि नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच गावातील सर्व लोक प्रतिनिधी संस्था तरुण मंडळे यांनी यामध्ये मध्ये पुढाकार घेऊन आपल्या ऐतिहासिक शिरोळ नगरीत छत्रपती शिवाजी महाराज तक्ता जवळ डाव्या बाजूस उत्तराभिमुख भव्य असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा.किंवा शिरोळ नगरीच्या वैभवात भर टाकणारा निसर्ग सौंदर्याने नटलेला श्री कल्लेश्वर तलाव या तलावाच्या मध्यभागी मोठ्या दिमाखात पूर्वाभिमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावां या महान कार्यासाठी आपल्या स्वाभिमान अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी आपण सारे जात-पात, धर्मपंथ,गट-तट पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊया आणि आपले स्वप्न साकार करू या..!
______________________________ ___
महाराष्ट्राचा स्वाभिमान……
हिंदवी स्वराज्य संस्थापक….
छत्रपती शिवाजी महाराज..!
“””””””””””””””””””””””””””””” “”””””””””””
महाराष्ट्र महान राष्ट्र मराठ्यांच्या तलवारीला
सौंदर्याचे तेज येतं तो हा महाराष्ट्र
सह्याद्रीच्या बुलंद कड्याचे हुंकार लाभलेला हिरव्यागार वनराईने नटलेला काळया कविन्य कातळाचा राखट कणखर आणि तितकाच कोमल आणि कनवाळू महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीत सामान्य माणसांना एकत्र करून स्वराज्याचे स्वातंत्र्याचं स्वाभिमानाचं स्फूलींग पेटवून ज्यांनी असामान्य इतिहास घडवला.या मातीच्या कणाकणात आणि माणसांच्या मनामनात स्वाभिमान पेरला लढवय्या मावळ्यांना मातीसाठी जगायला मातीसाठी लढायला आणि प्रसंगी मातीसाठी मरायला शिकवलं जिगरबाज मावळ्यांच्या साथीनं सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत अठरापगड जातींच गोरगरिबांच दीनदुबळ्यांच… शेतकऱ्यांचं मजुरांच कष्टकऱ्यांच सर्वसामान्य रयतेच हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.ते हिंदवी स्वराज्य संस्थापक सामाजिक लोकशाहीचे प्रणेते पुरोगामी विचाराचे उदगाते
अष्टपैलू,अष्टावधारी रणधुरंधर महापराक्रमी परमप्रतापी जिद्दी मुस्तदी निर्भिड थोर सेनानी प्रजाहित रक्षक.
प्रजावत्सल पर धर्मसहिष्ण चारित्र्यसंपन्न न्यायप्रिय, प्रयत्नवादी,विवेकवा दी,विज्ञाननिष्ठ, प्रतिभासंपन्न,संभाषण चतुर,बहुभाषिक, शास्त्रात्र,शास्त्र पारंगत,शककर्ते कुलवादीं भूषण.”प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिंहासनाधीश्वर…महाराजाधिराज. ..श्रीमंत… श्रीमंत…छत्रपती शिवाजी महाराज की जय…!!”
अशा माझ्या आदर्श राजाचा आमचा स्वाभिमान अस्तित्व असलेल्या सर्वांचे श्रद्धास्थान म्हणून प्रत्येकाच्या हृदयात स्थान टिकवून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिरोळ नगरीमध्ये उभा राहावा
हीच शिरोळकरांची इच्छा..!