कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सभात्याग -सरपंच निंबाळकर

यड्राव गावची ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून जोरदार वादळी ठरली.ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असे सांगितले, त्यावेळी ग्रामस्थातून सभेचे अध्यक्ष निवडावा अशी मागणीला ग्रामस्थांनी केली.त्यामुळे सुरूवातीचा वाद पाहून सरपंच असं सर्व सत्ताधारी सदस्यांनी सभा त्याग केला.परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवक धारेवर धरले.यावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी घोषणा झाल्याने परिसरात दणाणून गेला.दरम्यान ग्रामसेवक सरपंचच ग्रामसभेचा अध्यक्ष असण्यावर ठाम राहिल्याने कोरम पूर्ण असतानाही सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली.आज ग्रामभेत सन 2023 24 व 2024 / 25 च्या अंदाजपत्रकास मंजुरी करणेसह विविध विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते. ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घ्यावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास धारेवर धरले. त्यामुळे सभा एक तासाने सुरू झाली.सभेचे अध्यक्ष पद सरपंच कुणाल सिंग नाईक निंबाळकर यांनी स्वीकारावे असे ग्रामसेवक यांनी सुचविले.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला.ग्रामस्थांची सभाध्यक्ष म्हणून निवड करावी अशी मागणी लावून धरली.मात्र सभेचा अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतो त्यामुळे तो निवडता येणार नाही असे सांगितल्यावर वादावादीस सुरुवात झाली. यावेळी सरपंच,उपसरपंच व सत्ताधारी सदस्य असे समर्थकांनी सभेतून जाणे पसंत केले.तर ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने ही सभा झालीच पाहिजे,ग्रामसेवक उमेश शिराळकर यांनी घ्यावी अशी मागणी केली. यावेळी माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्याने ग्रामस्थ शांत झाले आणि सभा रद्द झाल्याचे लेखी पत्र ग्रामसेवकाकडून दिल्याने ग्रामस्थांनी सभागृह सोडले. सभागृहाच्या बाहेर संतप्त ग्रामस्थांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन पार्वती औद्योगिक वसाहतीस पाणी देण्यास विरोध दर्शविला.तर कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पाणी देणारच अशा घोषणा सत्ताधारी गटाकडून देण्यात आल्या त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

प्रतिक्रिया —
बजेटच्या प्रश्नावरून विकासात्मक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर गावसभा बोलविण्यात आली होती.या सभेचे अध्यक्ष पदसिद्ध सरपंच असतात असे प्रशासन सांगत होते.बजेट बाबतची संपूर्ण माहिती व सूचना सरपंच व प्रशासनाला असतात.मात्र याला जलजीवनचे वळण लावायचा प्रयत्न झाला. काही लोकांनी गोंधळ घातला.कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सभा त्याग करून ग्रामपंचायत प्रवेशद्वारा जवळ आलो. बीडीओंचे मार्गदर्शन घेऊन  पुढील ग्रामसभेचे नियोजन करावे अशी मागणी केली. राजकारणासाठी विकासात काहीजण खोडा घालत आहेत.सत्ताधाऱ्यांना विकास कामांचा फायदा होऊ नये म्हणून विरोधकांनी आजच्या सभेत गोंधळ घातला.अशा प्रवृत्तींचा मी निषेध करतो असे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
प्रतिक्रिया —
यड्राव ग्रामस्थातून ग्रामसभेचा अध्यक्ष निवडला जावा अशी आमची मागणी होती.गावच्या विकासाला आमचा विरोध नाही.परंतु सरपंचांनी मीच अध्यक्ष होणार या भूमिकेला आमचा विरोध आहे.सत्ताधारी गटाने सभेतून पळ काढला.या सभेला 168 ग्रामस्थांची उपस्थिती असताना त्यांचे म्हणणे ऐकण्याचे मानसिकता सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही.त्यामुळे सत्ताधारी गटाने ग्रामस्थांचा अपमान केला आहे.त्याचा मी निषेध करतो ग्रा.प .सदस्य हरीश नाईक यांनी सांगितलं
Spread the love
error: Content is protected !!