‘या’ गावात सरपंचांनीच अडवली एसटी, एसटी महामंडळ वर प्रवासी संतापले
जयसिंगपूर / प्रतिनिधी
गेली 20 वर्ष ‘वडाप मुक्त’ असलेल्या शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील एसटी गाड्यांचे वेळापत्रक पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून कोलमडले आहे.दिवसभर फेर्या करणार्या दोन
एसटीऐवजी एकच एसटी येत असल्याने आणि आज सकाळी 9 नंतर 10 वाजता येणारी एसटी न आल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सरपंच विजय खवाटे यांना एसटीबाबत तक्रारी केल्या.यानंतर 11 वाजता म्हणजेच
तब्बल दोन तासानंतर आलेली एसटी सरपंच विजय खवाटे यांंच्या नेतृत्वाखालीच अडवून धरण्यात आली.सरपंच विजय खवाटे यांनी थेट कोल्हापूर एसटी महामंडळ विभागाशी संपर्क साधून वडाप मुक्त व एसटी
युक्त असलेल्या आणि जिल्ह्यात आदर्श निर्माण केलेल्या कोथळी गावाचा लौकीक सांगून आमच्यावर अन्याय करू नका.गावाला एसटी सेवा सुरळीत ठेवा.वारंवार आंदोलन करावे लागू नये.निर्णय झाल्याशिवाय एसटी सोडणार
नाही, अशी भुमिका घेतली.यानंतर तातडीने वरिष्ठ पातळीवरून यंत्रणा गतीमान झाल्या. तासाभरातच जयसिंगपूर येथे एसटी स्टॅण्ड कार्यालयात कुरूंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे यांनी चर्चेसाठी सरपंच व
शिष्ट मंडळाला निमंत्रण दिले.त्यानंतर एसटी मार्गस्थ करण्यात आली.जयसिंगपूर येथे झालेल्या चर्चेदरम्यान दोन दिवसात दोन्ही फेर्यांच्या गाड्या पुर्वीप्रमाणेच सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.पुन्हा
वडापमुक्त गावावर अन्याय होणार नाही,असे आश्वासन मिळाल्याने प्रवाशांना व विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वृषभ पाटील,
शरद कांबळे,विलास कोरवी,माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे,सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.