पूरग्रस्त कृती समीतीच्या वतीने पंचगंगा नदी पुलाशेजारील लाक्षणिक उपोषण

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

पंचगंगा पुलाशेजारील महामार्गाचे भराव टाकून चाललेले रुंदीकरण थांबवून पिलर कमानीचे स्ट्रक्चर करून रुंदीकरण काम सुरु करावे , जिल्ह्यातील पूररेषेतील सर्व रस्त्यांवर फक्त भराव न टाकता शास्त्रीय आवश्यकतेनुसार पिलर कमानीचे स्ट्रक्चर व मोऱ्या बांधकाम सुरु करावे. या मागण्यांसाठी पूरग्रस्त समिती कोल्हापूरच्या वतीने शिरोली पुलाची येथील पंचागंगा नदी दर्ग्याशेजारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते त्यावेळी भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरणच्या अधिकार्यानी सांगली फाटा ते उचगाव पर्यंतच्या रस्त्याचे नविन सुधारित प्रपोजल येत नाही तोपर्यंत येथील रस्त्याचे काम थांबविण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले .
यापूर्वी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून रस्त्याचे काम पुर्ण केले पण या भरावामुळे पश्चिम दिशेच्या गावाना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे कारण या भरावामुळे पश्चिम दिशेला पुराच्या पाण्याची फुगिरपणा वाढत गेल्याने नागरिकांना पुराचा सामना करावा लागला आहे यासाठी सध्या सुरू असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा रस्त्यांवर पिलर कमानीचे स्ट्रक्चर करून जुन्या हायवेच्या लेवलप्रमाणे रुंदीकरण काम सुरु करावे यामुळे भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावाना पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही यासाठी लागेल ती मदत करण्यास कोल्हापूरकर तयार असल्याचे बाजीराव खाडे यानी सांगितले जर या रस्त्याचे पिलर कमानीचे स्ट्रक्चर व जुन्या हायवेच्या लेवलप्रमाणे रुंदीकरण काम होणार नसेल तर हे काम बंद पाडून येथील अधिकार्याना कोल्हापूरी इस्का दाखविण्यात येईल असे ते म्हणाले यावेळी अजय कोराणे अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूर यानी भारतीय राष्ट्रीय राज्य प्राधिकरणच्या अधिकार्याना बोलताना सांगितले कि हा होणार्या रस्त्यामुळे कोल्हापूर शहरासह पश्चिम दिशेच्या गावांना पुराचा फटका बसणार आहे त्यामुळे या स्ट्रक्चरमध्ये दिल्ली दरबारात सुधारणा करून पिलरचे स्ट्रक्चर तयार करून त्याप्रमाणे काम करावे कारण २०१८ शासनाच्या आदेशानुसार पुर क्षेत्र भागात पुराच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेच काम करू नये व जागतिक तापमान वाढ व हवामान बदल यामुळे बदललेल्या पर्जन्यमानाचे स्वरूप याला अनुसरून पुलाचे व पोच रस्त्याचे आराखडे बनवावेत ,कोल्हापूर व सांगली येथील पूराचे कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सुचविणे यासाठी 2019 मध्ये नेमलेल्या वडनेरे समिती च्या अहवालातील शिफारशीमधे देखिल पूर क्षेत्रातील रस्ते बांधकाम मार्ग, पूल आणि महामार्ग यांचे लोकेशन आणि फ्लड प्लेन झोन नुसार सुधारित डिझाईन करावे शिवाय अशा बांधकामांचे हायड्राॅलिक ॲाडिट करावे अशी शिफारस करण्यात आलेली आहे असोसिएशनच्या मते कोणताही पूर प्रवण क्षेत्रातील नदीवरील प्रत्येक पूल अणि त्याचे पोहोच रस्ते बांधताना व्हाया डक्ट पद्धतीचा वापर करावा तसेच त्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि पाटबंधारे अथवा संबंधित विभागाकडे उपलब्ध असलेले वैध तथ्ये, माहिती अणि संदर्भ नुसार सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर, पुणे सारख्या संस्थेकडून अशा पुलांचे आणि पोहोच रस्त्यांचे हायड्रॉलिक डिझाईन रिव्हर ट्रेनिंग अँड फ्लड कंट्रोल दृष्टिकोनातून तपासून घ्यावे असे सुचविले. तसेच तांत्रिक संस्था म्हणुन गरज पडल्यास असोसिएशन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणला पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. यावर अधिकार्‍यांनी आपल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून 10 दिवसात नवीन डिझाईन करून सुधारित एस्टीमेट शासनास सादर करू असे आश्वासित केले.
यावेळी अनेक अंदोलकानी आपले मनोगत व्यक्त केली.यावेळी राज डोंगळे,उदय फाळके, सचिन चौगुले,कृष्णात करपे,बाजीराव पाटील, तेजस्विनी पाटील,गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील (आबाजी),करवीरचे माजी सभापती बी.एच पाटील,गोकुळचे
संचालक बाळासाहेब खाडे,मार्केट कमिटी सभापती भारत पाटील-भुयेकर पुलाची शिरोली सरपंच सौ.पद्मजा करपे, शिये सरपंच सौ. शितल मगदूम,वरणगे पाडळी सरपंच शिवाजीराव गायकवाड,शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील,वडणगे माजी सरपंच सचिन चौगले,हंबीरराव वळके,जयसिंग पाटील यासह सुमारे ४० पूरग्रस्त गावातील सरपंच उपसरपंच,सदस्य व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!