सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा शिरोलीचा पीर अहमदसो व पीर बालेचाँदसो उरुस

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

मागणं मागावं आणि ते पूर्ण व्हावं अशी ख्याती असलेल्या पुलाची शिरोली येथे पीर अहमदसो व पीर बालेचाँदसो उरुसाला अनेक वर्षांची परंपरा आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत मोठ्या उत्साहात उरुस साजरा करतात. सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा उरुस म्हणजेच पुलाची शिरोलीचा पीर अहमदसो व पीर बालेचाँदसो उरुस असे म्हटले जाते. सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या या उरुसाला कोल्हापूर जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्व आहे. येथे येणाऱ्या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. त्यामुळे या उरुसाला भाविक भक्तांची अलोट गर्दी जमते.

४५ हजार लोकसंख्या असलेले पुलाची शिरोली गाव कोल्हापूर शहरापासून अवघ्या ५

सुमारे दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी पुलाची शिरो-लीतील गावकामगार पाटील सर्जेराव दादा पाटील

प्रत्येकी २५ आणे वर्गणी घेऊन संपूर्ण उरुसाचा कार्यक्रम होत असे. पीर बालेचाँदसो यांचे भक्त हामजू आबा मुलाणी या दर्याची मना पासून भक्ती करत होते. पुढे त्यांनी सर्जेराव दादा पाटील व बाळू पाटील यांना उरुसामध्ये गलेफ घालण्याचा मान दिला. या दर्याला प्रथम गोड नैवेद्य व नंतर खारा नैवेद्य देण्यात येऊ लागला.

दर्गा व मंदिराचे बांधकाम देणगीतून पूर्ण झाले. गुरुवारी व अमावस्येला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त येतात. पुढे उरूसाचा गलेफाचा मान गावकामगार पोलीस पाटील कै. माधवराव पाटील यांच्याकडे आला. त्यांच्या पश्चात पोलीस पाटील कै. तात्यासाहेब माधवराव पाटील व त्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेश व राजेश पाटील यांचा मान आहे. या घराण्याबरोबरच बाळू पाटील, कृष्णा पाटील, भाऊसाहेब पाटील व गणू पाटील यांचाही गलेफ घातला जात असे. सध्या या दर्याचे पुजारी म्हणून कै. मुसा व बाळू हामजू मुलाणी घराण्यातील दस्तगीर व जहाँगीर मुलाणी काम पहातात. हा उरूस हिंदू-मुस्लीम ऐक्याच प्रतिक आहे.

थंडीसह असाध्य रोगावर इलाज म्हणून आपण बसलेल्या जागेवरील माती अंगारा म्हणून लावत असत. अंगारा लावल्यानंतर आजार बरा होत असे. हे महाराज म्हणजेच पीर अहमदसो. त्यांची कामेरी (जि. सांगली) येथील चमण महात मनोभावे सेवा करत असत. सेवा करण्यासाठी ते तेथेच राहात असत. चमण महात यांनी या जा-गेवर वडाची झाडे लावली आहेत. पीर अहमदसो यांचा मृत्यू झाला. चमण महात त्यांच्या जागी पोथी वाचत बसले असता त्यांना दृष्टांत झाल्याने त्यांनी पीर अहमदसो यांची समाधी बांधली. त्यांच्या मृत्यूनंतर आबा महात यांनी कार्य पुढे चालू ठेवले. आबा महात यांनाही पीर अहमदसो दृष्टीस पडले व त्यांनी लोकांना सांगून उरूस साजरा करण्याचे ठरवले.

किलोमीटरवर पंचगंगा नदीच्या शेजारी असणारे सर्वच क्षेत्रामध्ये (राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा) अग्रेसर व सुशिक्षित व सधन गाव म्हणून ओळखले जाते. येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. पुरातन काळापासून चालू असलेला पीर अह्मदसो व पीर बालेचाँदसो यांचा उरूस पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

कोल्हापूरला जात असताना पंचगंगा नदीजवळ दगडाचा उगम झालेला त्यांना दिसला. त्यांनी या दगडाला नमस्कार केला आणि मी ज्या कामासाठी कोल्हापूर कोर्टात जात आहे. ते काम माझ्यासारखे झाल्यास एकत्रितपणे उरूस साजरा करीन, असे साकडे घातले. त्यांचे काम पूर्ण झाले. तेव्हापासून शिरोलीत उरूस सुरू झाला. पूर्वी शेतसारा (फाळा) ग्रामस्थांकडून

पीर अहमदसो पंचगंगा नदीकाठावर एका झाडाखाली एक साधू महाराज आले होते. ते साधू महाराज म्हणजे पीर अहमदसाहेब. ते ताप,

आबा महात यांच्या मृत्यूनंतर त्यांची या दर्याच्या शेजारी समाधी बांधण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा चाँद महात हे या पिराची देखभाल करू लागले. चाँद महात यांचा ५ डिसेंबर १९६४ रोजी मृत्यू झाल्यापासून बाळ महात व दस्तगीर महात पिराची देखभाल करीत आहेत. पीर अहमदसो दर्याची देखभाल मिरासाहेब व सलीम महात स्वखर्चाने करतात.

Spread the love
error: Content is protected !!