केद्र सरकार ने काल ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करणेचा आदेश काढला आहे.यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच तसेच या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतुन मिळणारे अधिकचे उत्पन्न मिळणार नाही.त्याचा परीणाम अंतीम ऊस दरावर होणार आहे.या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून या आदेशाची होळी स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे युवाआघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी सागर संभुशेटे म्हणाले एकाबाजूला रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारकडे मागणी करत असताना ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती वाढल्या चे कारण सांगत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला साखरेची निर्यात बंदी करणे , ऊसापासून इथेनॉल निर्मिती वर बंदी घालण्याचा काय अधिकार आहे. यावेळी पापालाल शेख,कलगोंडा पाटील, नितीन टारे,शितल लठ्ठे,भरत डंके, इकबाल मुरसल, सर्जेराव घोरपडे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते